तेजस्वी विचार

-
बुद्धीच्या स्तरावर असलेले विज्ञान अन् बुद्धीपलीकडील अध्यात्म !
‘विज्ञान अनेक वर्षे एखाद्या गोष्टीचे बुद्धीने स्थुलातील कारण शोधते. याचे कारण हे की, कारण कळल्याशिवाय त्याला उपाय कळत नाही, तर अध्यात्म त्यामागील बुद्धीपलीकडील सूक्ष्मातील शास्त्र आणि उपाय तात्काळ सांगते.’
-
एकमेवाद्वितीयत्व असा हिंदु धर्म !
‘काही पंथांत असते त्याप्रमाणे हिंदु धर्मात धर्मप्रसार करून निव्वळ स्वतःच्या धर्मियांची वा अनुयायांची संख्या वाढवण्याला महत्त्व नाही. याउलट हिंदु धर्मात धर्माच्या खोलात, सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे. याचा अर्थ आहे, ‘हिंदु धर्मात हिंदु धर्मातील शाश्वत मूल्ये आणि सिद्धांत समजून घेऊन त्यानुसार आचरण करून धर्माची अनुभूती, म्हणजे साक्षात् ईश्वराची अनुभूती घेण्याला महत्त्व आहे.’ हिंदूंचा धर्मप्रसार या तत्त्वावर आधारित असल्यामुळेच हिंदु धर्माचा गंधही नसलेले सहस्रो अन्य पंथीय विदेशी लोक आजही हिंदु धर्माकडे आकर्षित होऊन हिंदु धर्मानुसार आचरणही करत आहेत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
दिनविशेष
- देशबंधू चित्तरंजन दास यांचा स्मृतीदिन
- गुरुपौर्णिमेला ४३ दिवस शिल्लक
- ६ जून : शिवराज्याभिषेकदिन (दिनांकानुसार)
- ५ जून : पू. गोळवलकर गुरुजी यांचे पुण्यस्मरण (दिनांकानुसार)
राष्ट्र-धर्मविषयक चौकट
- हिंदूंनी सावध होणे महत्त्वाचे !आम्हा हिंदु लोकांचे तर संघटित नसणे, हे एक मोठे दुर्दैव आहे आणि ते अशा टोकाला गेले आहे की, ‘हिंदूंना संघटित व्हा’, असे म्हणणाराच अस्पृश्य ठरतो. गठ्ठामताच्या लोभाने अस्पृश्य ठरवला जातो.
- देशाचे अधःपतन होण्यामागील कारण‘आपले प्राचीन सिद्धांत आणि रितीरिवाज वाईट होते; म्हणून भारताचे पतन झाले !’, असे नव्हे, तर या सर्वांचे जे निर्दिष्ट ध्येय होते,
साधनाविषयक चौकट
- हृदयाची पवित्रता आणि वाक्संयम यांच्यामुळे शब्दांचे चैतन्य निर्माण होते !‘भगवंताच्या चरणी जे पूर्णपणे आत्मसमर्पण करतात, ते तथाकथित कार्यकर्त्यांपेक्षा जगाचे अधिक हित साधत असतात. पूर्णत: शुद्ध बनलेला एकच महापुरुष तथाकथित शेकडो उपदेशकांहून अधिक कार्य करत असतो.
- गुरुबोधज्याने जीवनकला आत्मसात् केली, जीवनशक्तीवर आपली सत्ता प्रस्थापित केली आणि जो जगण्यातील आनंद मिळवू शकतो, त्यानेच खरे जग जिंकले.
- साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !‘सध्या संपूर्ण जग आपत्काळाच्या उंबरठ्यावर आहे. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारखी रोगराई यांसारख्या विविध माध्यमांतून आपत्काळ कधीही येऊ शकतो. आजवर देवाने आपली साधना होण्यासाठी हा काळ थोपवून धरला आहे; पण तो आज ना उद्या येणारच आहे.
- स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व‘आपण पहिला धडा घेतला पाहिजे की, मी कोणत्याही बाह्य गोष्टीला केव्हाही शिव्या देणार नाही, दुसर्या कोणत्याही व्यक्तीला मी दोष देणार नाही. तसा निश्चय करा. माणूस व्हा, उठा आणि सर्व दोष स्वतःवर घ्या.





















