असेही कलियुगातील आई-वडील !

असेही कलियुगातील आई-वडील !

‘स्वतः भ्रष्टाचार करून स्वतःच्या मुलांसमोर भ्रष्टाचार करण्याचा आदर्श ठेवणारे कलियुगातील आई-वडील !’

कुटुंबियांचा भ्रष्टाचार उघड करणे हे राष्ट्रकर्तव्यच आहे !

कुटुंबियांचा भ्रष्टाचार उघड करणे हे राष्ट्रकर्तव्यच आहे !

‘तरुणांनो, आपले आई-वडील भ्रष्टाचार करून पाप करत असले, तर त्यांना पुढील पापांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचा भ्रष्टाचार उघड करा आणि तुमची राष्ट्रभक्ती वाढवा ! पतीचा भ्रष्टाचार, अनैतिक वागणे इत्यादी उघड करणे, हे पत्नीचेही राष्ट्राच्या संदर्भातील कर्तव्य आहे.’

साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !

साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !

‘डोळ्यांनी जंतू दिसत नाहीत; पण ते सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाही, असे सूक्ष्मातीसूक्ष्म जग साधनेने कळते.’

देश दुर्दशेला पोचण्यामागे हे आहे कारण !

देश दुर्दशेला पोचण्यामागे हे आहे कारण !

‘सुखासाठीच्या सर्व गोष्टी शिकवणारे आई-वडील आणि सरकार मुलांना चांगले अन् सात्त्विक काहीच शिकवत नाहीत. त्यामुळे देश दुर्दशेच्या परिसीमेला पोचला आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’

ही आहे राजकीय पक्षांची दु:स्थिती !

ही आहे राजकीय पक्षांची दु:स्थिती !

‘हल्ली निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांत चांगले उमेदवार अल्प प्रमाणात असल्याने मतदारांना त्यातल्यात्यात कमी वाईट उमेदवाराला मत द्यावे लागते !’

अध्यात्मशास्त्रासंदर्भात कांहीही संशोधन न करणारे हे कसले बुद्धीप्रामाण्यावादी ?

अध्यात्मशास्त्रासंदर्भात कांहीही संशोधन न करणारे हे कसले बुद्धीप्रामाण्यावादी ?

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी कधी संशोधन करण्यासाठी उपकरणांचा वापर करून ‘अध्यात्मशास्त्र चुकीचे कसे आहे’, हे सिद्ध केले नाही; पण महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘अध्यात्मशास्त्र चिरंतन सत्य सांगते’, हे शेकडो प्रयोग करून सिद्ध केले आहे आणि अनेक राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय परिषदांत शोधप्रबंध सादर केले आहेत.’

गुरूंचे श्रेष्ठत्व !

गुरूंचे श्रेष्ठत्व !

‘संत मायेतील अडचणी सोडवून साधनेची ओळख करून देतात, तर गुरु मोक्षप्राप्तीची वाट दाखवतात !’

अंतत: ईश्वरी कायदे आणि जमाखर्च हेच महत्त्वाचे !

अंतत: ईश्वरी कायदे आणि जमाखर्च हेच महत्त्वाचे !

‘पृथ्वीवरील कायदे आणि जमाखर्च इत्यादी सर्व व्यर्थ आहेत. शेवटी प्रत्येकाला ईश्वरी कायदे आणि जमाखर्च इत्यादींना सामोरे जावे लागते.’

हिंदु धर्माच्या शिकवणीला चुकीचे म्हणणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

हिंदु धर्माच्या शिकवणीला चुकीचे म्हणणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘काही पंथीय पैसे देऊन किंवा धमकावून इतरांना त्यांच्या पंथात खेचतात. याउलट हिंदु धर्मात येतात ते त्यातील अद्वितीय शिकवणीमुळे ! असे असले तरी बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु धर्माच्या शिकवणीला चुकीचे म्हणतात !’

धर्मांधांनी केलेली राष्ट्रहानी आणि त्याकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष !

धर्मांधांनी केलेली राष्ट्रहानी आणि त्याकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष !

‘धर्मांधांमध्ये राष्ट्रप्रेमापेक्षा धर्मप्रेम अधिक असल्यामुळे ते धर्मासाठी कधीही आणि कितीही राष्ट्रहानी करतील’, हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांच्या अन् बहुसंख्य हिंदूंच्या लक्षात आले नाही’, हे त्यांना लज्जास्पद आहे !’