
नागपूर – वर्ष २००८ मध्ये मुंबईवरील आतंकवादी आक्रमणातील मुख्य आरोपी अजमल कसाब याने कारागृहात मटण बिर्याणी मागितली होती, ही बातमी जाणीवपूर्वक मीच पेरली होती, असे विद्यमान राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी केले. येथील एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
याविषयीचा उद्देश स्पष्ट करतांना ते म्हणाले,
१. कसाबचा खटला चालू असतांना रक्षाबंधनाचा दिवस असल्याने माझ्या हाताला राखी बांधलेली होती. कसाबने याविषयी विचारल्यावर मी त्याला रक्षाबंधनाच्या दिवसाचे महत्त्व सांगितले. इतक्यात न्यायाधीश न्यायासनावर आले.
२. माझा आणि कसाबचा संवाद त्यांना सांगितल्यानंतर कसाबने मान खाली घातली आणि डोळे पुसल्यासारखे केले. न्यायालयाबाहेर उपस्थित असलेल्या माध्यमांनी लगेचच ‘कसाबच्या डोळ्यांत पाणी’ असे ठळक वृत्त दिले. कसाबविषयी सहानुभूती निर्माण होऊ नये, यासाठी मी माध्यमांना जाऊन सांगितले की, कसाबने मटण बिर्याणी मागितली. त्यानंतर लगेचच ते वृत्त दाखवले जाऊ लागले.
३. दुसर्या दिवशी न्यायालयात कसाबच्या अधिवक्त्यांनी आदल्या दिवशीच्या घटनेविषयी विचारले. मी म्हटले, ‘‘तो पाकिस्तानातून आला आहे, प्रतिदिन मांसाहार करत असेल. मग बिर्याणी मागितली नसेल का ? त्यालाच विचारा.’’ न्यायालयातील चर्चा कसाबला पूर्ण ठाऊक नव्हती. बिर्याणी देण्याविषयी बोलणे चालू असल्याचे वाटून त्याने लगेच मान हलवली. त्यामुळे ‘कसाबने बिर्याणी मागितली’, अशी वृत्ते दाखवली गेली. त्याने खरंच बिर्याणी मागितली होती कि नाही, हे केवळ त्यालाच ठाऊक असेल.
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
(म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी