विविध प्रसंगांतून ‘कृतज्ञता कशी असायला हवी ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिकायला मिळणे !

‘हे प्रभो, एकदा मी रामनाथी आश्रमात काही सेवांच्या निमित्ताने आल्यावर मला आपले दर्शन झाले. त्या वेळी तुम्ही मला काय म्हणालात, ते आठवते ना ! ‘मी तुम्हाला भेटू शकलो नसल्याने फार अस्वस्थ झालो होतो. आज तुमच्या दर्शनामुळे माझ्यावर कृपा झाली’, हे तुमचे शब्द होते. भगवंता, तुम्ही मला निःशब्द केले होते.

अधूनमधून मी तुमच्या त्या शब्दांचे स्मरण करत होते. ‘यातून तुम्हाला मला काय शिकवायचे आहे ?’, हे जाणून घेण्यासाठी मी काही मास अभ्यास आणि चिंतन केले. जेव्हा साक्षात् परमेश्वराला माझ्यासारख्या सर्वसाधारण साधकाला भेटल्यावर कृपा झाल्याचे वाटत असेल, तर मला साधक भेटल्यावर, त्यांच्याशी संवाद साधतांना, दूरभाषवर त्यांचा आवाज ऐकतांना, त्यांचा सत्संग मिळाल्यावर किंवा त्यांचा विचार केल्यावर कसे वाटले पाहिजे ? साधक तर तुमचे सगुण रूप आहेत; मात्र माझ्यासारख्या अज्ञानी जिवाला हे लक्षात येत नाही. या प्रसंगामुळे तुम्ही माझा दृष्टीकोन पूर्णपणे पालटला आहे. हे प्रभो, तुम्ही मला अध्यात्मातील एक महत्त्वाचा धडा प्रायोगिक आणि आनंददायी पद्धतीने शिकवला. आम्हाला अध्यात्म शिकवण्यासाठी एवढ्या प्रायोगिक आणि आनंददायी पद्धती तुम्हाला कशा काय सुचतात ?’
– पू. (सौ.) उमा रविचंद्रन्, चेन्नई (२९.११.२०१६)
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !