
‘जिज्ञासूंना साधनेकडे वळवण्याचे आणि धर्मप्रेमींना प्रत्यक्ष कृतीला उद्युक्त करण्याचे सर्वोत्कृष्ट माध्यम म्हणजे नियतकालिक सनातन प्रभात ! हे नियतकालिक नियमित वाचून वाचकांमध्ये साधनेची गोडी निर्माण होत आहे, तसेच त्यांच्यात राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दलचे प्रेम वाढत आहे. ‘या अंकाच्या वाचनाने आम्हाला पुढची दिशा आणि मार्गदर्शन मिळते’, असे काही वाचक उत्स्फूर्तपणे सांगतात.
असे असतांनाही ‘प्रथम भेटीतच जिज्ञासूंना वाचक बनण्यास कसे सांगू ? त्यांच्याशी जवळीक साधून नंतर वाचक होण्यासाठी प्रवृत्त करूया’, असे बर्याच साधकांना वाटते. त्यामुळे ते जिज्ञासूंना वाचक होण्यासाठी तत्परतेने उद्युक्त करत नाहीत.
आपल्या अयोग्य विचारप्रक्रियेमुळे जिज्ञासू अमूल्य सत्संगापासून वंचित राहू नयेत, यासाठी सर्वत्रच्या साधकांनी जिज्ञासूंना वाचक बनवण्यासाठी प्रथम भेटीपासूनच प्रयत्न करावेत.’
(१२.५.२०२६)
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : योग-आयुर्वेद
साधकांना सूचना : काल अमावास्या झाली.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !