विविध प्रसंगांतून ‘कृतज्ञता कशी असायला हवी ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिकायला मिळणे !

‘वर्ष १९९१ – १९९२ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर मुंबईहून येऊन गोवा येथे मासातून (महिन्यातून) एकदा अध्यात्माविषयी अभ्यासवर्ग घ्यायचे. त्या वेळी मी त्यांच्या अभ्यासवर्गाला जात असे. अभ्यासवर्गाच्या वेळीच माझी त्यांच्याशी भेट होत असल्याने मला त्यांच्या भेटीसाठी एक मास वाट पहावी लागत असे.

आमची भेट झाल्यावर प.पू. डॉक्टरांचा मला पहिला प्रश्न असायचा, ‘‘यजमान कसे आहेत ?’’ तेव्हा माझ्या मनात यायचे, ‘माझे यजमान परात्पर गुरु डॉक्टरांची कधी आठवणही काढत नाहीत आणि मी एक मास चातकाप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांची वाट पाहून अभ्यासवर्गाला उपस्थित रहाते. असे असूनही ते माझी काहीच विचारपूस न करता केवळ यजमानांचीच विचारपूस का करतात ?’ काही वेळा या विचारांमुळे मला थोडे वाईट वाटायचे. असे ५-६ मास झाल्यानंतर मला त्याविषयी वाईट वाटायचे थांबले. त्यानंतर बर्याच मासांनंतर माझ्या लक्षात आले, ‘ज्यांच्यामुळे आपण या अभ्यासवर्गांना जाऊ शकत आहोत, त्यांच्याप्रती मनात कृतज्ञताभाव असावा’, हेच परात्पर गुरु डॉक्टर मला या कृतीतून शिकवत आहेत.’
– सौ. विजयालक्ष्मी बसवराज आमाती, फोंडा, गोवा. (६.३.२०१७)
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी नवीन प्रश्न विचारण्याची कारणे आणि त्यांचे होणारे लाभ
साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !