मत्स्यव्यवसाय विकासासाठी भारतातील पहिले एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्याचा प्रयत्न !

राज्याला ७२० किलोमीटर सागरी किनारा लाभला आहे. सागरी किनार्‍यालगतच्या पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील मत्स्यव्यवसाय विकासासाठी एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

भंडारा येथे औरंगजेबचे स्टेटस ठेवणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !

शोएब शेख याने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर औरंगजेबचे स्टेटस ठेवले तसेच आक्षेपार्ह पोस्टही प्रसारित केल्या. या प्रकरणी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे २०० कार्यकर्ते, तसेच पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन धर्मांधाच्या अटकेची मागणी केली.

विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर काढून टाकण्याच्या मागणीसाठी आयोजित निदर्शनाच्या कालावधीत ‘धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी’ विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

औरंगजेबाचे सूत्र सध्या सयुक्तिक नाही ! – सुनील आंबेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

औरंगजेबाचे सूत्र सध्या सयुक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

Prakash Ambedkar : (म्हणे) ‘औरंगजेबाची कबर म्हणजे दुसरी अयोध्या होण्याची शक्यता !’

औरंगजेबाच्या कबरीचा संबंध अयोध्येशी जोडणे, हा हिंदुद्वेष नव्हे का ?

Nagpur StonePelting On Ambulance : नागपूर दंगलीत घायाळ झालेल्या पोलिसांना नेणार्‍या रुग्णवाहिकेवर दगडफेक !

ही घटना पहाता नागपूर येथील दंगल अद्याप शमलेली नाही, हे दिसून येते ! आक्रमणकर्ते पोलिसांवर आक्रमण करण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. अशा प्रकारे मोकाट फिरणार्‍या दगडफेक्यांवर कारवाई कधी होणार ?  

Karad Krishnamai Mandir Theft : कराडचे ग्रामदैवत कृष्णामाई मंदिरात चोरी

कृष्णामाई मंदिरात वारंवार चोरी होत असूनही येथे सीसीटीव्ही कॅमेरे का बसवले गेले नाहीत ? यातून प्रशासनाला हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण व्हावे, असे वाटत नाही, असे हिंदूंनी समजायचे का ?

नारायणगाव (पुणे) येथील कापड दुकानाला भीषण आग !

नारायणगाव बसस्थानकाशेजारी असलेल्या धवल चव्हाण यांच्या ‘अष्टविनायक रेडिमेडस्’ या कापड दुकानाला १८ मार्चला पहाटे ४.३० वाजता आग लागली. आगीमध्ये दुकानदाराची ५ कोटी रुपयांची हानी झाली.

औष्णिक विद्युत् केंद्रातील राखेसाठी नवीन समान धोरण अमलात आणू ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्याची विक्री करण्याचे समान धोरण आखले जाईल. ते योग्य पद्धतीने राखेची विल्हेवाट लावेल आणि भ्रष्टाचारमुक्त असे असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देत होते.

पुणे शहरातील ‘कोयता गँग’मागील ‘सूत्रधारां’वर कडक कारवाई करणार ! – मुख्यमंत्री

पुण्यात कोणतीही ‘कोयता गँग’ अस्तित्वात नाही. विधीसंघर्षित मुले हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. सराईत गुन्हेगार या मुलांना हाताशी धरून दहशत निर्माण करून हप्ते गोळा करतात.