बुद्धीच्या स्तरावर असलेले विज्ञान अन्‌ बुद्धीपलीकडील अध्यात्म !

बुद्धीच्या स्तरावर असलेले विज्ञान अन्‌ बुद्धीपलीकडील अध्यात्म !

‘विज्ञान अनेक वर्षे एखाद्या गोष्टीचे बुद्धीने स्थुलातील कारण शोधते. याचे कारण हे की, कारण कळल्याशिवाय त्याला उपाय कळत नाही, तर अध्यात्म त्यामागील बुद्धीपलीकडील सूक्ष्मातील शास्त्र आणि उपाय तात्काळ सांगते.’

एकमेवाद्वितीयत्व असा हिंदु धर्म !

एकमेवाद्वितीयत्व असा हिंदु धर्म !

‘काही पंथांत असते त्याप्रमाणे हिंदु धर्मात धर्मप्रसार करून निव्वळ स्वतःच्या धर्मियांची वा अनुयायांची संख्या वाढवण्याला महत्त्व नाही. याउलट हिंदु धर्मात धर्माच्या खोलात, सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे. याचा अर्थ आहे, ‘हिंदु धर्मात हिंदु धर्मातील शाश्वत मूल्ये आणि सिद्धांत समजून घेऊन त्यानुसार आचरण करून धर्माची अनुभूती, म्हणजे साक्षात् ईश्वराची अनुभूती घेण्याला महत्त्व आहे.’ हिंदूंचा धर्मप्रसार या तत्त्वावर आधारित असल्यामुळेच हिंदु धर्माचा गंधही नसलेले सहस्रो अन्य पंथीय विदेशी लोक आजही हिंदु धर्माकडे आकर्षित होऊन हिंदु धर्मानुसार आचरणही करत आहेत.’

अन्य धर्मियांचे ध्येय आणि हिंदूंचे ध्येय यांतील भेद !

अन्य धर्मियांचे ध्येय आणि हिंदूंचे ध्येय यांतील भेद !

‘इतर धर्मियांचे ध्येय असते ‘दुसर्‍या धर्मियांवर अधिकार गाजवणे’, तर हिंदूंचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती !’

बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !

बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !

‘इतर देशांना देशांतर्गत शत्रू नसतात. भारताला आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू आहेत. असे शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत. भारतियांना हे लज्जास्पद !’

का उमेदवारांना मतांची भीक मागावी लागते ?

का उमेदवारांना मतांची भीक मागावी लागते ?

‘मतदारांकडून मतांची भीक मागावी लागते, हे उमेदवारांना लज्जास्पद ! त्यांनी निवडून आल्यावर मतदारांसाठी काही केले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.’

तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

‘खरे बुद्धीप्रामाण्यवादी प्रयोग करून निष्कर्षाला येतात. याउलट स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणवणारे साधनेचे, अध्यात्माचे प्रयोग न करता ‘ते खोटे आहेत’, असे म्हणतात !’

पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारून विनाशाच्या दिशेने जात असलेला समाज !

पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारून विनाशाच्या दिशेने जात असलेला समाज !

‘पूर्वीच्या पिढ्यांमध्ये वैचारिक अंतर (जनरेशन गॅप) नसायचे. प्रत्येक पिढी आधीच्या पिढीशी समरस व्हायची. आजोबा, पणजोबांपासून नातवंडे, पतवंडे एकत्र असायची. हिंदूंनी पाश्चात्त्य संस्कृतीचा अंगीकार केल्यामुळे २ पिढ्यांतील, म्हणजेच आई-वडील अन् मुलगा-सूनही एकमेकांशी समरस होऊ शकत नाहीत. आता नवरा-बायकोचेही एकमेकांशी पटत नाही. लग्नानंतर अल्प कालावधीतच त्यांचा घटस्फोट होतो ! ’

भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !

भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !

‘सहस्रो वर्षांपासून भारतातील हिंदूंनी ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल केली, इतर देशांप्रमाणे पृथ्वीवर आपले साम्राज्य स्थापण्यासाठी प्रयत्न केले नाहीत; कारण त्यांना त्यातली निरर्थकता ज्ञात होती.’

शाळेत मुलांना हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम

शाळेत मुलांना हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम

‘स्वातंत्र्यापासून आता-पर्यंतच्या ७८ वर्षांपर्यंतच्या शासनकर्त्यांनी मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्यामुळे मुलांना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे त्यांना धर्माचा अभिमान ज्ञात नाही. याउलट मुसलमानांना धर्माभिमान असल्याने जगभर त्यांचा वचक आहे.’

लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !

लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !

‘अध्यात्मशास्त्रामुळे विज्ञान कळते; पण विज्ञानामुळे अध्यात्म कळत नाही !’