सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत करण्यात आलेल्या ‘श्री दुर्गासप्तशती अनुष्ठाना’तील श्री दुर्गादेवीच्या चित्राच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांचे सर्व शारीरिक त्रास दूर व्हावेत आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, म्हणून त्यांच्या खोलीमध्ये १८ ते २५.१.२०२४ या कालावधीत शाकंभरी नवरात्रीनिमित्त श्री दुर्गासप्तशतीचे पठण केले जात होते. या अनुष्ठानात श्री दुर्गादेवीच्या चित्राची पूजा केली जात होती.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंध फेब्रुवारी २०२४ या मासामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर !

ऑक्टोबर २०१६ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९३ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ११३ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत करण्यात आलेल्या ‘श्री दुर्गासप्तशती अनुष्ठाना’तील श्री दुर्गादेवीच्या चित्राच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

या अनुष्ठानाचा उद्देश ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांचे सर्व शारीरिक त्रास दूर व्हावेत आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे’, हा होता. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य पूर्ण होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जिवंत रहाणे अत्यावश्यक आहे’, असे सप्तर्षींनी सांगितले आहे.

स्त्रियांनी ‘हेवी मेकअप’ (गडद रंगभूषा) केल्याने त्यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

स्त्रियांनी ‘हेवी मेकअप’ (गडद रंगभूषा) केल्याने त्यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी  ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

स्त्रियांनी कपाळावर कुंकू लावल्याने त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे

कुंकवातून प्रक्षेपित होणार्‍या तारक-मारक चैतन्यामुळे वाईट शक्तींना स्त्रियांच्या आज्ञाचक्रातून शरिरात प्रवेश करण्यात अडथळा निर्माण होतो. कुंकवामुळे स्त्रियांच्या भोवती चैतन्याचे कवच निर्माण होत असल्याने त्यांचे वाईट शक्तींपासून रक्षण होते.

सूर्याला अर्घ्य दिल्याने व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे

‘सूर्याला अर्घ्य दिल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

उन्हाचे उपाय केल्याने (अंगावर ऊन घेतल्याने) व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे !

उन्हाचे उपाय केल्याने व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे करण्यात आलेल्या चाचणीचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण या लेखात दिले आहे.

श्रीरामरक्षास्तोत्र पठण, तसेच श्रीरामाचा नामजप करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणे; मात्र स्तोत्रपठणाच्या तुलनेत नामजपाचा परिणाम अधिक होणे

‘श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करणे आणि श्रीरामाचा नामजप करणे यांचा ते करणार्‍यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचण्या करण्यात आल्या.

महर्षींच्या आज्ञेनुसार करण्यात आलेल्या ‘आयुष होमा’च्या संदर्भातील संशोधन !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळावे, सर्वत्रच्या साधकांचे सर्व त्रास दूर व्हावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यांसाठी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात २ दिवसांचाआयुष होम करण्यात आला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या खोलीत करण्यात आलेल्या ‘श्री दुर्गासप्तशती अनुष्ठाना’च्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

परात्पर गुरु डॉक्टरांची खोली मुळातच चैतन्यमय आहे आणि अनुष्ठानामुळे तिची सात्त्विकता आणखी वाढली, हे या चाचण्यांतून दिसून आले.