सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकाला साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

एक साधक, सातारा : ‘काही दिवसांपासून माझ्या मनात ‘धर्मकार्य करावे कि नाही ?’, असा नकारात्मक विचार येत होता. आता सत्संगात तुम्हाला पाहून ‘धर्मकार्य लगेच चालू करावे. आपण इतके दिवस वाया घालवले’, असे विचार माझ्या मनात येत आहेत. आता ‘मनातील नकारात्मक विचार पुसून टाकून पुन्हा धर्मकार्यासाठी उभे रहावे’, असे मला वाटत आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, मनात नकारात्मक विचार न येता तिची ईश्वराकडील ओढ वाढत जाते. तुम्ही साधनेचे प्रयत्न आणि सेवा चालू ठेवा. साधना वाढली, म्हणजे मनातील सगळे नकारात्मक विचार आपोआप जातील.
तुम्हाला आध्यात्मिक त्रासही आहे. हा त्रास जाण्यासाठी थोडी साधना वापरली जाते आणि उर्वरित साधना साधनेत प्रगती होण्यासाठी वापरली जाते. काळजी करू नका.’
बुद्धीच्या स्तरावर असलेले विज्ञान अन् बुद्धीपलीकडील अध्यात्म !
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !