परिपूर्ण सेवा करणारे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सतत अनुसंधानात रहाणारे पुणे येथील सनातनचे १२५ वे संत पू. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७६ वर्षे) !

पुणे येथील श्री. अरविंद सहस्रबुद्धे हे मागील १८ वर्षांपासून सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा करत आहेत. ते १२ वर्षांहूनही अधिक काळ साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या संदर्भातील सेवा अचूकपणे करत आहेत.

सतत साधकांच्‍या प्रगतीचा ध्‍यास असणार्‍या आणि साधकांना घडवण्‍यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. सुप्रिया माथूर !

‘सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी, गोवा येथील आश्रमात सेवा करणार्‍या सौ. सुप्रिया माथूर या साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतात. त्‍यांंच्‍याकडून व्‍यष्‍टी साधनेच्‍या आढाव्‍यात शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

रत्नागिरी येथील आहिताग्‍नी वेदमूर्ती केतन शहाणे आणि सौ. कल्‍याणी शहाणे यांना ‘श्रौत अग्‍निहोत्र’ घेतांना (व्रत अंगीकारतांना) आलेल्‍या अनुभूती

१५.५.२०२३ या दिवशी आहिताग्‍नी वेदमूर्ती केतन शहाणे यांनी ‘श्रौत अग्‍निहोत्र’घेतले. त्‍या वेळी त्‍यांना आणि त्‍यांच्‍या पत्नी सौ. कल्‍याणी शहाणे यांना झालेले त्रास, आलेल्‍या अडचणी, वेळोवेळी त्‍यांना देवाने कुणाच्‍या तरी माध्‍यमातून केलेले साहाय्‍य आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भावपूर्ण प्रार्थना केल्‍यामुळे भाताची रोपे शेतासाठी पुरून त्‍यातून अन्‍य शेतकर्‍यांचीही भातलावणी होणे

सौ. मनीषा गव्‍हाणे यांची पिकांसंदर्भातील अनुभूती आळंदे येथील गावातील धर्मशिक्षणवर्गात वाचून दाखवली. ही अनुभूती वाचताच वर्गातील सर्व महिलांचा भाव जागृत झाला आणि त्‍यांच्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू येऊ लागले.

कोलकाता येथील पू. डॉ. शिवनारायण सेन यांना स्‍वप्‍नात विविध दृश्‍ये दिसणे आणि त्‍यानंतर मन निर्विचार होऊन शांतीची अनुभूती येणे

‘१७.८.२०२३ या दिवशी रात्री मला एक स्‍वप्‍न पडले. त्‍यात ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्‍या स्‍वप्‍नात आले. तेथे मला हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारेही आल्‍याचे दिसले. गुरुदेवांनी माझ्‍या मस्‍तकावर हात ठेवला.

‘साधना केली (देवाचे केले) आणि हानी झाली (नुकसान झाले)’, असे जगात एकतरी उदाहरण आहे का ?

‘आपल्या जन्माचा उद्देश ‘प्रारब्ध भोग भोगून संपवणे आणि आनंदप्राप्ती (ईश्‍वरप्राप्ती) करणे’ हा आहे. याचा आज मानवाला पूर्णपणे विसर पडला आहे. त्यामुळे ‘साधना करणे, म्हणजे जीवन वाया घालवणे’, असे त्यांना वाटते. याविषयी पूर्णवेळ साधकाचे अनुभव ऐकून ‘गुरु आणि ईश्‍वर अशा साधकांची कशी काळजी घेतात ? आणि त्याला सर्वोच्च
सुख, म्हणजेच आनंद कसा प्राप्त करून देतात ?’, हे शिकता येईल.

साधकांनो, आता काळानुसार समष्टी साधना ६५ टक्के आणि व्यष्टी साधना ३५ टक्के महत्त्वाची असल्याने व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवा !

‘समष्टी साधना म्हणजे समाजाची साधना आणि व्यष्टी साधना म्हणजे व्यक्तीची साधना. पूर्वी कालमहिम्यानुसार समष्टी साधनेला ७० टक्के आणि व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व होते; पण आता काळानुसार समष्टी साधना ६५ टक्के आणि व्यष्टी साधना ३५ टक्के महत्त्वाची आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चौकटीनुसार स्वतःचे त्रासदायक आडनाव पालटून आज्ञापालनाचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे श्री. अशोक भागवत !

‘२३.७.२०२३ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘त्रासदायक अर्थ असणार्‍या आडनावांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत असल्यान अशी आडनावे पालटा !’, ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची चौकट प्रसिद्ध झाली होती. सनातनचे साधक श्री. अशोक दहातोंडे यांनी ही चौकट वाचली आणि त्याप्रमाणे त्रासदायक अर्थ असणारे आपले आडनाव पालटून ‘भागवत’, असे आडनाव लावले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी साधकांना देण्यात आलेल्या उत्सवचिन्हाच्या (बिल्ल्याच्या) संदर्भातील अनुभूती

‘संत म्हणजे चैतन्याचे स्रोत ! संतांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचे कपडे, त्यांचे लिखाण आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य सामावलेले असते अन् प्रत्येक वस्तूमधून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होते. त्यामुळे अशा वस्तू जपून ठेवण्याची पद्धत रूढ आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवात रथामागील टाळपथकात सहभागी होतांना आलेल्या अनुभूती

कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले हेच जगन्नाथ आहेत. त्यामुळे त्यांचा रथ ओढण्याचे सौभाग्य साधकांना मिळावे आणि त्यात सगळ्या साधकांना सहभागी होता यावे.’ माझ्या मनात हा विचार आला