मुंबई सेवाकेंद्रामध्ये प.पू. डॉक्टरांच्या सहवासात असतांना सेवेच्या संदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे !

‘‘सेवा झाल्यावर आपल्या अंतर्मनात समाधान झाले का ?’, हे पहावे. ते होईपर्यंत सुधारणा करत रहाव्यात. ‘अंतर्मनात समाधान झाले’, असे वाटले, तर ‘ती सेवा परिपूर्ण झाली. नाहीतर ती परिपूर्ण नाही झाली’, असे लक्षात घ्यावे.’’

‘जिणे गंगौघाचे पाणी’, म्हणजे गंगेच्या प्रवाहाच्या पाण्याप्रमाणे निर्मळ आणि पवित्र असे व्यक्तीमत्त्व असलेले पू. (कै.) प्रा. रत्नाकर रामचंद्र मराठे !

‘अध्यात्म, संगीत आणि भक्ती या अजोड संगमावरील मानवी शिल्पे काही निवडक व्यक्तींच्या रूपात आपल्या सभोवती वावरत असतात. याची जाणीव होऊन त्यांच्या परिस स्पर्शाने पुनीत होण्याचे भाग्य मला या जन्मी लाभले. अशा दुर्मिळ व्यक्तींपैकी एक, म्हणजे पू. (कै.) रत्नाकर मराठे !  

अपेक्षा न करता साधना करत रहायचे !

‘मला ‘साधनेमध्ये स्थिर रहायला हवे. साधना अंतर्मनापासून सातत्याने व्हावी’, असे वाटते; परंतु कधी कधी माझी बहिर्मुखता असते. 

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती संध्या बधाले यांनी रुग्णाईत असतांना अनुभवलेली गुरुकृपा !

मी रुग्णालयात असतांना आणि आश्रमात आल्यावर माझे नातेवाईक किंवा साधक मला भेटायला आल्यावर सांगत, ‘‘तुमच्याकडे पाहून तुमचे नुकतेच शस्त्रकर्म झाले आहे’, असे वाटत नाही. तुमचा चेहरा आनंदी दिसत आहे.

साधक साधनेतील अडथळे किंवा होत असलेले त्रास दूर करण्यासाठी ‘नामजपाचे मंडल घालणे’ या योजत असलेल्या सोप्या उपायाचा त्यांना लाभ होण्याचे कारण म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून देवतेचा कृपाशीर्वाद मिळवून देणारी करवून घेतलेली साधना !

साधक करत असलेले पंचतत्त्वांचे नामजप, उच्च देवतांचे नामजप, तसेच ‘शून्य, महाशून्य, निर्गुण आणि ॐ’, हे निर्गुण स्तराचे नामजप त्यांना सिद्ध झाल्यासारखेच आहेत.

रुग्णाईत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून आनंदी रहाणार्‍या श्रीमती संध्या बधाले (वय ५१ वर्षे) !

आई या कालावधीत नामजपादी उपाय आणि भावजागृतीचे प्रयत्न करत असे अन् श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या वाणीतील सत्संग ऐकत असे. ती शस्त्रकर्म होण्याच्या आधी आणि नंतरही नामजपादी उपाय पूर्ण करत होती. त्यामुळे ‘तिला परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ऊर्जा मिळत आहे’, असे मला वाटले.

साधकांवर प्रीती करून त्यांच्याकडून व्यष्टी साधना आणि समष्टी साधना करवून घेणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

सद्गुरु स्वातीताईंनी कोल्हापूर सेवाकेंद्रामध्ये गणेशपूजन केले. तेव्हा सेवाकेंद्रातील वातावरण अतिशय आनंदी आणि चैतन्यदायी झाले होते. तेव्हा मला सद्गुरु स्वातीताईंमध्ये साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन झाले. 

राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रती प्रेम असणारे अन् अध्यात्माची आवड असणारे सांगली येथील कै. नारायण रघुनाथ कुलकर्णी (वय ८२ वर्षे) !

आबांना धर्माविषयी पुष्कळ प्रेम होते. वर्ष १९९२ मध्ये बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी, तसेच त्या जागी श्रीराममंदिर उभारण्यासाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळी आबांची सरकारी नोकरी असूनही ते अयोध्येला गेले होते.

आजचा वाढदिवस : चि. शिवांश सागर तेरेकर

चैत्र कृष्ण द्वितीया (१५.४.२०२५) या दिवशी दापोली, रत्नागिरी येथील चि. शिवांश सागर तेरेकर याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘सेवा आणि नामजप’ यांविषयी केलेले मार्गदर्शन !

आपण देवाला साहाय्यासाठी रात्रं-दिवस कधीही हाक मारतो, आपल्याला देवासारखे व्हायचे आहे, म्हणजे रात्रं-दिवस सेवा करायला हवी !