हृदयाची पवित्रता आणि वाक्संयम यांच्यामुळे शब्दांचे चैतन्य निर्माण होते !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘भगवंताच्या चरणी जे पूर्णपणे आत्मसमर्पण करतात, ते तथाकथित कार्यकर्त्यांपेक्षा जगाचे अधिक हित साधत असतात. पूर्णत: शुद्ध बनलेला एकच महापुरुष तथाकथित शेकडो उपदेशकांहून अधिक कार्य करत असतो. हृदयाची पवित्रता आणि वाक्संयम यांच्याच योगाने शब्दांचे चैतन्य निर्माण होत असते. ओज निर्माण होत असते.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)