Kargil War Anniversary : पाकपुरस्कृत आतंकवाद्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत ! – पंतप्रधान मोदी
मी आतंकवाद्यांना सांगू इच्छितो की, त्यांचे ‘नापाक’ मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत, अशी चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. कारगिल युद्धाच्या २५ व्या विजय दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमाच्या वेळी पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना चेतावणी देतांना पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले.