पाकमधील हिंदूंचे रक्षण कोण करणार ?

पाकिस्तानातील हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याला कंटाळून तेथील हिंदूंना भारतात यायचे आहे; मात्र भारताचा व्हिसा न मिळाल्याने हिंदु समाजातील अनेकांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती भारतात आलेल्या पाकिस्तानी हिंदूंनी दिली.

‘वन्दे मातरम्’ म्हणणे अनिवार्य करा !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील पालिका आणि नगर पंचायत यांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथग्रहणाच्या वेळी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास एम्.आय.एम्.च्या मुसलमान सदस्यांनी विरोध केल्यावर त्यांनी भाजप सदस्यांसमवेत हाणामारी केली.

तृणमूल काँग्रेस सरकारची हुकूमशाही जाणा !

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्याविरुद्ध बंगाल पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या चित्रपटात बंगालमधील घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना तृणमूल काँग्रेस सरकारने साहाय्य केल्याचे दाखवण्यात आले आहे.

‘ॲम्नेस्टी इंडिया’चा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम जाणा !

 ‘ॲम्नेस्टी इंडिया’ने कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडे राज्यात शाळा आणि महाविद्यालये येथे हिजाबवरील बंदी हटवणे, गोहत्यांना अनुमती देणे आणि मंदिरांजवळील मुसलमानांच्या दुकानांवर बहिष्कार घालण्याच्या विरोधात कारवाई करणे, अशा मागण्या केल्या आहेत.

‘द केरल स्टोरी’ला विरोध करणार्यांना चपराक !

कराची (पाकिस्तान) येथील कारागृहात अटकेत असणारा केरळच्या पलक्कडमधील झुल्फिकार (वय ४८ वर्षे) याचा मृत्यू झाला आहे. त्याचा संबंध इस्लामिक स्टेटशी होता.

ही वसुली कधी होणार ?

११ ऑगस्ट २०१२ या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात घडवलेल्या दंगलीच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रझा अकादमीकडून ३६ लाख रुपयांची वसुली करण्याचा आदेश दिला; पण ११ वर्षांनंतरही ही वसुली झालेली नाही.

हिंदूंना धर्मशिक्षण द्या !

‘जोपर्यंत भारतातील प्रत्येक मंदिर हिंदूंना हे शिकवणार नाही की, सनातन म्हणजे काय ? हिंदु म्हणजे काय ? तोपर्यंत धर्मांतराच्या घटना घडत रहातील’, असे विधान बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले.

बंगालमधील हुकूमशाही जाणा !

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही बंगालमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर अवैधरित्या बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटगृहांच्या मालकांना पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून धमक्या येत आहेत, असा आरोप चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी केला.

बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !

धर्मांध मुसलमानांनी १७ मेच्या रात्री बांगलादेशच्या नौगाव जिल्ह्यातील महादेवपूर उपजिल्ह्यात असलेल्या नोहाटा मोर, सरकार पारा येथील काली मंदिराला आग लावली

अशा धर्मांधांवर कठोर कारवाई करा !

चिखली (बुलढाणा) येथे एका विवाहाच्‍या वरातीत डी.जे.वर भगवान श्रीरामाचे लावलेले गाणे धर्मांधांनी थांबवण्‍यास सांगत वरातीवर दगडफेक केली.