मलप्पूरम् (केरळ) येथील मंदिरात हिजाब परिधान केलेल्या महिलेकडून बूट घालून प्रवेश !

हिंदूंच्या देशात अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस होतेच कसे ? इस्लामी देशात अन्य धर्मीय असे करण्याचे धाडस करू शकतील का ? साम्यवाद्यांच्या राज्यात हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे पावित्र्य अशा प्रकारे भंग केले जात असेल, तर आश्‍चर्य काय ?

हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण कधी होणार ?

केरळच्या मलप्पूरम् या मुसलमानबहुल जिल्ह्यातील वन्नियामबलम् मंदिरात बूट घालून प्रवेश केल्याच्या प्रकरणी हिजाब घातलेल्या एका महिलेच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

आसुरी वृत्तीचा कोण ?

हिंदु धर्माचे मर्म लक्षात घेऊन आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करूनच चित्रपट काढावा, अन्यथा हिंदू शांत बसणार नाहीत. धार्मिक इतिहासात फेरफार करणारे हेच हिंदूंच्या दृष्टीने दुष्प्रवृत्तीचे आहेत. अशांना वैध मार्गाने वठणीवर कसे आणायचे, याचे तंत्र हिंदूंना अवगत आहे, हेही संबंधितांनी जाणावे !

‘कल्पवृक्ष’ आस्थापनाच्या संकेतस्थळावरून हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांची विक्री

येथील ‘कल्पवृक्ष’ या आस्थापनाच्या संकेतस्थळावरून चित्रांची विक्री करण्यात येते. यात हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचाही समावेश आहे. यामुळे हिंदु धर्माभिमानी या आस्थापनाचा विरोध करत हुसेन यांच्या चित्रांची विक्री रोखण्याची मागणी करत आहेत.

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर अज्ञातांकडून प्राणघातक आक्रमण

बजरंग दलाचे श्री. नागेश यांच्यावर येथील उर्दू शाळेजवळ १० ते १५ जणांनी  शस्त्रांद्वारे प्राणघातक आक्रमण केले. आक्रमणामागील कारण समजू शकलेले नाही. श्री. नागेश हे गोरक्षण, धर्मांतर रोखणे आदी धर्मकार्यात आघाडीवर असतात.

हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण कधी होणार ?

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील बजरंग दलाचे सक्रीय कार्यकर्ते श्री. नागेश यांच्यावर येथील उर्दू शाळेजवळ १० ते १५ जणांनी शस्त्रांद्वारे प्राणघातक आक्रमण केले. यात गंभीररित्या घायाळ झालेल्या श्री. नागेश यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

शरणार्थी आणि भारताचे दायित्व

बाहेरून देशात येणारा कोणताही हिंदु हा घुसखोर नसून तो शरणार्थी आहे आणि त्याला सन्मानाचे जीवन अन् अधिकार मिळायलाच हवेत, हे लक्षात ठेवून भारताने शरणार्थींच्या संदर्भात आपले नैतिक दायित्व पार पाडावे, ही अपेक्षा !

(म्हणे) ‘न्यायी बळीराजाला वामनाने कपटाने मारले !’ – प्रभाकर नारकर, सामाजिक कार्यकर्ते

पौराणिक कथांमधील घटनांचा भावार्थ लक्षात न घेता केवळ बौद्धिक तर्क काढून समाजाचा बुद्धिभेद करायचा, हे बुद्धिप्रामाण्यवाद्यांचे काम आहे. त्यामुळे जनतेने शास्त्र समजून घेऊन त्यांच्या तर्कांचे खंडण केले पाहिजे अन् सणही साजरे केले पाहिजेत.

गाजीपूर (देहली) येथे गोहत्या केल्यानंतर फेकलेले गायींचे शिर दाखवणारा व्हिडिओ प्रसारित

गोमाताद्रोही देहली पोलीस ! देहली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना त्यांच्याकडून अशा प्रकारची निष्क्रीयता दाखवणे हिंदूंना अपेक्षित नाही !

राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात गाजलेल्या पुणे शहराला हे लज्जास्पद !

पुणे महानगरपालिका पर्यावरण रक्षणाच्या गोंडस नावाखाली सातत्याने काही ना काही धर्मद्रोही उपक्रम राबवत आहे. आता तर धर्मद्रोहाची परिसीमा गाठत विसर्जनासाठी दान म्हणून घेतलेल्या श्री गणेशमूर्तींची पुनर्विक्री करत असल्याचे उघड झाले आहे !