राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १५.०५.२०२२
रविवारच्या वाचकांसाठी आठवड्यातील काही प्रमुख बातम्या
रविवारच्या वाचकांसाठी आठवड्यातील काही प्रमुख बातम्या
‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘पावनखिंड’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत; मात्र याचे तिकीटदर सामान्य लोकांना न परवडणारे असल्याने हे चित्रपट करमुक्त करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे प्रमाणपत्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून नव्हे, तर ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ या धर्मांध संघटनेकडून दिले जाते. या ‘हलाल’ अर्थव्यवस्थेने विश्वभरात दबदबा निर्माण केला असून तिने भारताच्या अर्थव्यवस्थेइतका म्हणजे २ ट्रिलीयन ‘डॉलर्स’चा टप्पा गाठला आहे.
अपप्रकार करणार्यांवर गुन्हे न नोंदवणे, म्हणजे एकप्रकारे अशा अपप्रकारांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देण्याचाच प्रकार नव्हे का ?
आताचे सरकार आदिवासी आणि मागासवर्गीय आरक्षणाला पाठिंबा देणारे आहे; मात्र काही लोक राजकीय आकसापोटी सरकार संविधान बदलणार असल्याची अफवा पसरवत आहे; पण मी सरकारमध्ये असेपर्यंत संविधानाला हात लावू देणार नाही.
भारतातही पाद्री आणि धर्मांतराच्या कारवायांमध्ये सहभागी असलेले ख्रिस्ती प्रचारक यांची दुष्कृत्ये उघड करणे अन् त्यांच्या घृणास्पद षड्यंत्रापासून देशाला मुक्ती देणे यांसाठी राष्ट्रीय स्तरावर एक चौकशी आयोग स्थापन करावा.
सामाजिक माध्यमांचा वापर करतांना सावधगिरी बाळगणे, स्वत:च्या अनुमतीविना आपले एखादे छायाचित्र किंवा व्हिडिओ यांचा गैरवापर झाल्यास त्याविरोधात त्वरित तक्रार करणे आदी सावधगिरी बाळगल्यास ‘सायबर गुन्ह्यां’मध्ये घट होऊ शकते
‘देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणी काहीही बोलू शकतो’, असे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हे हिंदूंच्या देवतांचा अथवा श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला, तर लगेच म्हणतात, तर मग नथुराम गोडसे यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल, तर त्या वेळी त्यांची भूमिका उलट का असते ?
भारतातील कट्टर मुसलमान देशाची नोकरशाही स्वत:च्या नियंत्रणात घेण्यासाठी ‘यू.पी.एस्.सी. जिहाद’ म्हणजेच ‘नोकरशाही जिहाद’ चालवत आहेत. भारताच्या ‘यू.पी.एस्.सी.’ परीक्षेत ‘जकात फाऊंडेशन’ या संस्थेचे मुसलमान विद्यार्थी भारतातून मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण होत आहेत.
पाकिस्तानमधील उत्तर वजिरिस्तान येथे २ ऑक्टोबरला तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (‘टीटीपी’) या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये पाकच्या सुरक्षादलाचे ५ सैनिक ठार झाले.