अग्नीकाष्ठासह दहनासाठीचे साहित्य विनामूल्य ! – सुधीर एकांडे, वैकुंठधाम सुधार समिती

पर्यावरण रक्षण हा उद्देश ठेवून वैकुंठधाम सुधार समिती आणि कराड नगरपालिका यांच्या सहकार्याने दहनासाठी मोठ्या प्रमाणात होणार्‍या वृक्षतोडीला आळा बसावा; म्हणून काही उपक्रम हातात घेण्यात आले होते.

श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या पूजेची २५ मार्चपासून ‘ऑनलाईन’ नोंदणी ! – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी

श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे २५ सहस्र आणि ११ सहस्र रुपये, पाद्यपूजेसाठी ५ सहस्र रुपये, तर तुळशी अर्चन पूजेसाठी २१ सहस्र रुपये घेण्यात येईल.

आंचल गोयल मुंबईच्या नव्या जिल्हाधिकारी !

मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव यांचे २५ फेब्रुवारी या दिवशी स्थानांतर केल्यावर त्यांच्या जागी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आधी नागपूर महानगरपालिकेत आयुक्त पदावर कार्यरत होत्या.

क्रूरकर्मा औरंग्याची कबर उखडून टाका ! – विश्व हिंदु परिषद बजरंग दलाची मागणी

यापुढे जोपर्यंत ही कबर उखडली जात नाही, तोपर्यंत हा लढा असाच चालू रहाणार असल्याचे विश्व हिंदु परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांनी सांगितले. निषेध नोंदवून झाल्यावर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 

धर्मांधांच्या खोट्या तक्रारीनंतर राष्ट्रीय बजरंग दलाचे जळगाव शहरप्रमुख प्रवीण कोळी यांना अटक !

हिंदुत्वनिष्ठांविरुद्ध खोट्या तक्रारी करणार्‍या धर्मांधांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे ! तसे न करता हिंदुत्वनिष्ठांना अटक करणे, म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी देणे’, असा प्रकार होय ! 

संबंधित प्राध्यापकाचे निर्दाेषत्व सिद्ध होण्याची शक्यता

गोवा विद्यापिठातील भौतिकशास्त्र विभागातील प्रश्नपत्रिकेची चोरी केल्याच्या प्रकरणी विद्यापिठाचे साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

हलक्या दर्जाचे आले-लसूण मिश्रण विकणार्‍या तिघांना प्रत्येकी ५० सहस्र रुपये दंड 

हलक्या दर्जाचे आले-लसूण मिश्रण विकणार्‍यांना उत्तर गोवा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अन् न्यायनिर्णय अधिकारी यांनी प्रत्येकी ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरणाचा मार्ग मोकळा ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भविष्यातील प्रकल्पांसाठी, तसेच आवश्यक निधीच्या तुटवड्याचे संकट सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

शाळेचे फादर नोबित यांनी बूट घालून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला !

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उघडउघड अवमानच आहे ! अशांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !

मत्स्यव्यवसाय विकासासाठी भारतातील पहिले एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्याचा प्रयत्न !

राज्याला ७२० किलोमीटर सागरी किनारा लाभला आहे. सागरी किनार्‍यालगतच्या पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील मत्स्यव्यवसाय विकासासाठी एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.