मुंबई मेट्रोत अश्‍लील नृत्‍य करणार्‍या तरुणीच्‍या व्‍हिडिओवर मुंबईकर संतापले

मेट्रोमध्‍ये एका तरुणीचा ‘बेली डान्‍स’ नावाचा अश्‍लील नृत्‍यप्रकार करतांनाचा व्‍हिडिओ प्रसारित होत आहे. प्रसिद्धी मिळवण्‍यासाठी तरुण-तरुणी अशा प्रकारच्‍या गोष्‍टी हल्ली मोठ्या प्रमाणात करतात; परंतु या व्‍हिडिओवर मुंबईकरांनी जोरदार संतप्‍त प्रतिक्रिया दिल्‍या आहेत.

(म्हणे) ‘रशियाने शांतता निर्माण करून युक्रेनशी संवाद साधावा !’ – जस्टिन ट्रुडो

स्वत:च्या देशात सत्ता आणि अधिकार हाताशी असतांना तेथील हिंदूंची मंदिरे आणि उच्चायुक्तालय यांवरील आक्रमणे रोखून शांतता प्रस्थापित करू न शकणारे ट्रुडो दुसर्‍या देशाला कोणत्या तोंडाने उपदेश करतात ?

इराणमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घातल्यास १० वर्षांचा कारावास

इराणच्या संसदेने सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्यास नकार देणार्‍या आणि त्यांना पाठिंबा दर्शवणार्‍या महिलांना शिक्षेची तरतूद असलेले विधेयक संमत केले.

भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा थांबवली !

कॅनडात झालेल्या खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यात चालू झालेल्या वादातून आता भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याचे तात्पुरते थांबवण्यात आल्याची घोषणा केली आहे.

(म्हणे) ‘भारताच्या राजदूतांची हकालपट्टी करा, रा.स्व संघावर बंदी घाला !’ – कॅनडातील मुसलमान संघटना

अशा प्रकारच्या मागण्या करून कॅनडातील मुसलमान संघटना भारतद्वेषाचा कंड शमवून घेण्याचा प्रयत्न करत आहे !

खलिस्तानचे समर्थन करणारा गायक शुभनीत सिंह याच्या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व ‘बोट’ आस्थापनाने काढले !

बोट आस्थापनाचे अभिनंदन ! खलिस्तान्यांवर आता देशभरातून बहिष्कार घालण्यास प्रारंभ झाल्यावर ते ताळ्यावर येतील !

नियमभंग करून कॅनडाने अधिकार्‍याचे नाव केले उघड !

कॅनडाने भारताच्या विरोधात एकप्रकारे युद्धच चालू केले आहे. भारताने आता कॅनडाला या युद्धात पराभूत करून त्याची जगात छी थू होईल, असा प्रयत्न केला पाहिजे !

श्रीलंकेकडून पुन्हा एकदा चीनच्या हेरगिरी करणार्‍या नौकेला बंदरावर थांबवण्याची अनुमती !

आर्थिक दिवाळखोर झालेल्या श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळण्यासाठी चीनने नाही, तर भारताने साहाय्य केले होते. त्यानंतर श्रीलंका पुन्हा उभा रहात आहे; मात्र याची परतफेड श्रीलंका जर अशा प्रकारे करत असेल, तर भारताने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे !

पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍प कायमस्‍वरूपी बंद करण्‍यासाठी ठाकरे गटाचा ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ !

पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍प कायमस्‍वरूपी बंद करावा, पुन्‍हा कार्यान्‍वित करू नये, या मागणीसाठी मावळ तालुका उद्धव ठाकरे पक्षाच्‍या वतीने पवनानगर येथे ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ काढण्‍यात आला.

कर्नाटकमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा टिळा लावून घेण्यास नकार !

काँग्रेसचे हिंदु नेते मशिदीमध्ये जाऊन गोल टोपी घालतात, तसेच रमझानच्या वेळी इफ्तारच्या मेजवान्यांना उपस्थित रहातात; मात्र या नेत्यांना स्वतःच्या धर्माची कृती करण्याच्या वेळी त्यांना अस्पृश्यता वाटते. असे लोक अस्पृश्यतेवर इतरांना ‘ज्ञान’ देत असतात !