कन्यादान आणि सप्तपदी या विधींविना केलेला नोंदणीकृत विवाह अवैधच ! – मुंबई उच्च न्यायालय
कन्यादान आणि सप्तपदी हे हिंदु विवाह पद्धतीमधील सर्वांत महत्त्वाचे विधी आहेत. हे विधी न केल्यास विवाह पूर्ण होत नाही. या विधींविना असलेले नाते आणि समाजमंदिरांमधून मिळवलेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र अवैध ठरील, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने नोंदवले.