निसर्गाचा र्‍हास नव्हे, तर त्याचे संरक्षण झाले पाहिजे ! – आमदार भीमराव अण्णा तापकीर, भाजप

धूलिवंदनाच्या दिवशी जलाशयाचे संरक्षण होण्याच्या  उद्देशाने गेली २२ वर्षे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून उभे रहातात. धरणाच्या पाण्यात कुणी उतरू नये, तसेच पाण्याचे प्रदूषण होऊ नये यांसाठी समिती निःस्वार्थपणे हे कार्य करत आहे.

पीओपीविषयी ‘राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग’ तज्ञ समिती अभ्यास करणार ! – सांस्कृतिक कार्य मंत्री अधिवक्ता आशिष शेलार

पीओपीच्या (प्लास्टर ऑफ पॅरिसच्या) श्री गणेशमूर्तीच्या वापराविषयी स्पष्टता यावी, यासाठी ‘राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग’ तज्ञ समिती अभ्यास करणार आहे. शासन मूर्तीकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून येत्या २० मार्चला शासन न्यायालयात भूमिका मांडेल.

बसगाड्या खरेदी निविदा प्रक्रियेतील दोषी अधिकार्‍यांवर १ महिन्यात कारवाई करू ! – मुख्यमंत्री फडणवीस

सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाकडून १ सहस्र ३१० बसगाड्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता.

सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही ! – मंत्री अदिती तटकरे

राज्य सरकार बहिणींची फसवणूक करत आहे. आश्वासन दिल्याप्रमाणे सरकार २ सहस्र १०० रुपये देत नाही. या कारणावरून विरोधकांनी गदारोळ करत काही वेळेकरिता सभात्याग केला.

वडखळ (रायगड) येथील घरपोच पोषण आहारात मृत प्राणी नसल्याचा अहवाल !

बालकांसाठीचा घरपोच आहार मानवी हस्तक्षेप विरहीत यंत्राद्वारे करण्यात येतो. त्यासाठी १५ ते २० दिवसांचा अवधी लागतो. पाकिटामध्ये प्राण्याचे अवशेष हे ओल्या स्वरूपात असून तो १-२ दिवसामध्ये मृत झाला असावा, हा अहवाल चुकीचा असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

होळीच्या निमित्ताने अनोळखी व्यक्तींवर रंगांचे फुगे फेकल्यास होणार कारवाई !

होळीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी लावल्यास, अश्लील हावभाव केल्यास, तसेच अनोळखी व्यक्तींवर रंगांचे फुगे फेकल्यास कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी मुंबई पोलिसांनी दिली आहे.

विक्रोळी येथे हिंदु युवक-युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले !

विक्रोळी पार्क येथील नीलकंठेश्वर मंदिर येथे हिंदु युवक – युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले. यामध्ये कराटे, दंडसाखळी, लाठी-काठी यांचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच वक्त्यांनी भारतीय संस्कृती आणि भारताचा गौरवशाली इतिहास यांविषयी संबोधित केले.

‘मल्हार सर्टिफिकेशन’ या नावाला खंडोबा देवस्थानाचा पाठिंबा, तर ग्रामस्थ मंडळाचा विरोध !

शासनाने ‘सर्टिफिकेट’ची आणलेली योजना चांगली असून त्याला आमचा पाठिंबा आहे; मात्र या योजनेस ‘मल्हार’ हे नाव न देता इतर नाव द्यावे.

येत्या ६ मासांत गोव्यातील खाणव्यवसाय पूर्णपणे चालू होईल ! – केंद्रीय खाणमंत्री जी. किशन रेड्डी

सर्वाेच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार येत्या ६ मासांत गोवा राज्यातील खाण व्यवसाय पूर्णपणे चालू होईल, असे आश्वासन केंद्रीय खाण व्यवसाय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिले आहे.

गोवा नगर नियोजन कायद्याचे कलम १७ (२) उच्‍च न्‍यायालयाकडून रहित

नगर नियोजन कायद्यातील कलम १७ (२) मधील नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे यांनुसार करण्‍यात येणारी कार्यवाही उच्‍च न्‍यायालयाकडून रहित करण्‍यात आली आहे.