काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित !

बेंगळुरू शहरात असलेल्या नगरथपेटे येथील हिंदूंच्या दुकानात हनुमान चालिसा लावल्यावरून काही मुसलमान तरुणांनी दुकानातील मुकेश नावाच्या हिंदु तरुणावर चाकूने आक्रमण केले.

हे हिंदूंना अपेक्षित नाही !

महाराष्ट्र सरकारने २ वर्षांपूर्वी मद्यविक्री करणार्‍या दुकानांना देवता, राष्ट्रपुरुष, महनीय व्यक्ती आणि गड-दुर्ग यांची नावे देण्यात येऊ नयेत, असा आदेश काढला असतांनाही त्यात पळवाटा असल्याने हा..

मुंबईत हिंदू असुरक्षित !

मुंबईतील मढ समुद्रकिनार्‍याच्या जवळील मढ-लोचर या हिंदूबहुल गावात स्थानिक कोळ्यांना होलिका दहन आणि त्या संबंधीच्या प्रथा-परंपरा पाळण्यास तेथील ख्रिस्त्यांनी विरोध केला.

पाकिस्तान आणि अमेरिका यांची नसती उठाठेव !

नागरिकत्व सुधारणा कायदा श्रद्धेच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव निर्माण करतोे, अशी टीका पाकिस्तानने केली आहे. तसेच ‘या कायद्याची कार्यवाही कशी होईल ? यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत’, असे अमेरिकेने म्हटले आहे.

अशांवर कारवाई का होत नाही ?

‘मी मंत्री असल्यामुळे सध्या शांतता राखली आहे. मी मंत्री नसतो, तर मी पंतप्रधान मोदी यांचे तुकडे केले असते’, असे विखारी विधान तमिळनाडूतील द्रमुक सरकारमधील ग्रामीण उद्योग मंत्री टी.एम्. अंबरसन यांनी केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

भारत ‘पाकिस्तान’ आहे का ?

मुसलमानांचा पवित्र मास रमझानच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने शाळांच्या वेळांमध्येच पालट केले आहेत. तसा आदेश राज्यातील शाळांना देण्यात आला आहे. आंध्रप्रदेश शालेय शिक्षण विभागानेही उर्दू माध्यमाच्या शाळांच्या वेळा पालटल्या आहेत.

मुस्लिम लीगला ओळखा !

‘सीएए’ कायद्याच्या विरोधात इंडियन युनियन मुस्लिम लीगने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. निर्वासित मुसलमानांना नागरिकत्वापासून दूर ठेवण्यात आल्यामुळे या कायद्यावर बंदी घालण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

देशातील अशी सर्व ठिकाणे हिंदूंना परत द्या !

ज्ञानवापीच्या धर्तीवर मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने धार भोजशाळेचे सर्वेक्षण करण्याचा आदेश पुरातत्व विभागाला दिला आहे. राजा भोजने बांधलेली ही भोजशाळा एक विद्यापीठ होते.

काँग्रेस सरकार असे का करत नाही ?

जर कुणी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असेल, तर त्यांना सरळ गोळ्या घाला. त्यात काहीच अडचण नाही, असे विधान काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे मंत्री के.एन्. राजन्ना यांनी केले.

रस्त्यावरील नमाजपठणावर निधर्मीवादी गप्प का ?

देहलीत रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांनी लाथ मारून उठवल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे भाग्यनगर येथील आमदार टी. राजासिंह यांनी तोमर यांचे समर्थन करत मशिदींमध्ये नमाजपठण करावे, असे म्हटले आहे.