भारताने अमेरिकेकडून शिकावे !

अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने हिंदुद्वेष (हिंदुफोबिया) आणि हिंदुविरोधी भेदभाव रोखण्यासाठी कायदा केला आहे. असे करणारे ते अमेरिकेतील पहिले राज्य बनले आहे. या कायद्यामुळे हिंदूंच्या संदर्भात भेदभाव आणि द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये कारवाई करण्याचा अधिकार तेथील सरकारला मिळाला आहे.

बंगालचा बांगलादेश झाला आहे, हे जाणा !

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंसाचाराच्या वेळी हरगोविंद दास आणि त्यांचा पुत्र चंदन दास यांची हत्या करण्यात आली. ते दोघेही हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करत होते.

हिंदूंवर आक्रमण करण्याचे धर्मांधांचे कारस्थान जाणा !

आगरा (उत्तरप्रदेश) येथील शाही जामा मशिदीत अज्ञातांकडून इस्लाममध्ये निषिद्ध असणार्‍या प्राण्याचे मांस फेकल्याने तणाव निर्माण झाला. या प्रकरणी पोलिसांनी नझरूद्दीन या मुसलमानाला अटक केली आहे.

मंदिरांच्या भूमींवरील अतिक्रमणेही हटवा !

महाराष्ट्र राज्यातील वक्फ बोर्डाच्या ६० टक्क्यांहून अधिक भूमींवर अतिक्रमण झाले आहे. वक्फ कायदा झाल्यामुळे आता राज्यातील भूमींवरील ही अतिक्रमणे सरकार हटवणार आहे.

राज्यघटनाद्रोही बंगाल सरकार विसर्जित करा !

बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू केला जाणार नाही, अशी घोषणा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे जैन धर्मियांच्या एका कार्यक्रमात बोलतांना केली.

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लागू होणार ?

बंगालच्या मुसलमानबहुल मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात मुसलमानांनी मोर्चा काढून हिंसाचार केला. त्यांनी पोलिसांवर आक्रमण करत त्यांच्या अनेक वाहनांची जाळपोळ केली.

यावर सरकार स्वतःहून कारवाई का करत नाही ?

गोवंडी परिसरात तब्बल ७२ मशिदी आणि मदरसे असून त्यांच्यावर असलेले भोंगे अनधिकृत आहेत. याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मागवली होती.

हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करा !

सरकारने केवळ हिंदूंच्या मंदिरांवर नियंत्रण ठेवू नये, तर चर्च आणि मशिदी यांवरही नियंत्रण ठेवावे. त्यासाठी कायदा करावा, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांची भेट घेऊन केली आहे.

असे शासनकर्ते सर्वत्र हवेत !

उत्तरप्रदेशात श्रीरामनवमीनिमित्त सर्व मंदिरांमध्ये २४ घंटे श्री रामचरितमानसचे अखंड पठण केले जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले होते.

देशातील प्रत्येक गाव ‘हिंदु गाव’ करा !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी छतरपूर (मध्यप्रदेश) येथील गढा गावाजवळ एका ‘हिंदु गावा’ची पायाभरणी केली. या गावात १ सहस्र हिंदु कुटुंबांना वसवण्यात येणार आहे. या गावात संस्कृत शाळा, गोशाळ, यज्ञशाळा असणार आहेत.