तेजस्वी विचार

-
असेही कलियुगातील आई-वडील !
‘स्वतः भ्रष्टाचार करून स्वतःच्या मुलांसमोर भ्रष्टाचार करण्याचा आदर्श ठेवणारे कलियुगातील आई-वडील !’
-
कुटुंबियांचा भ्रष्टाचार उघड करणे हे राष्ट्रकर्तव्यच आहे !
‘तरुणांनो, आपले आई-वडील भ्रष्टाचार करून पाप करत असले, तर त्यांना पुढील पापांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचा भ्रष्टाचार उघड करा आणि तुमची राष्ट्रभक्ती वाढवा ! पतीचा भ्रष्टाचार, अनैतिक वागणे इत्यादी उघड करणे, हे पत्नीचेही राष्ट्राच्या संदर्भातील कर्तव्य आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
दिनविशेष
- २७ जून : शिवराज्याभिषेक (हिंदुसाम्राज्य) दिन !
- २६ जून : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती (तिथीनुसार)
- २४ जून : महर्षि याज्ञवल्क्य यांची जयंती
- गुरुदेव रानडे यांची पुण्यतिथी
राष्ट्र-धर्मविषयक चौकट
- कुटुंब हा भूतलावरील स्वर्ग होण्यासाठी परस्परांशी सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध असावेत !जेथे दही घुसळल्याचा आवाज येत नाही, जेथे छोटी छोटी बालके नाहीत, जेथे वडील मंडळींच्या वडीलपणाचा आदर नाही, ती कसली आली आहेत घरे ? ती तर अरण्ये होत !’
- हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !‘जडवादी शक्तींचे केंद्रस्थान बनलेला युरोप स्वतःची आजची भूमिका पालटून अध्यात्माला स्वतःच्या जीवनाचा आधार बनवणार नसेल, तर ५० वर्षांच्या आत तो धुळीला मिळेल आणि उपनिषदांत सांगितलेला धर्मच युरोपला वाचवू शकेल.’
साधनाविषयक चौकट
- साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !‘सध्या संपूर्ण जग आपत्काळाच्या उंबरठ्यावर आहे. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारखी रोगराई यांसारख्या विविध माध्यमांतून आपत्काळ कधीही येऊ शकतो. आजवर देवाने आपली साधना होण्यासाठी हा काळ थोपवून धरला आहे; पण तो आज ना उद्या येणारच आहे.
- ‘मनाचे श्लोक’रूपी संस्कारत्ने !समाजात जे वाईट आणि निंदनीय आहे, ते टाळावे. जे चांगले, आदर्श आणि सर्वांना मान्य आहे, ते आचरणात आणावे.
- आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !‘आयुष्यभर थोडीफार नामजपादी साधना केल्यानंतर म्हातारपणी त्याची आठवण झाल्यावर ‘आयुष्यात देवासाठी काही तरी केले !’, याची जाणीव होते आणि आयुष्याच्या पुढील प्रवासाच्या संदर्भात निश्चिंतता होऊन मनाला एक समाधान लाभते !’
- हृदयाची पवित्रता आणि वाक्संयम यांच्यामुळे शब्दांचे चैतन्य निर्माण होते !‘भगवंताच्या चरणी जे पूर्णपणे आत्मसमर्पण करतात, ते तथाकथित कार्यकर्त्यांपेक्षा जगाचे अधिक हित साधत असतात. पूर्णत: शुद्ध बनलेला एकच महापुरुष तथाकथित शेकडो उपदेशकांहून अधिक कार्य करत असतो.





















