प्रतापगडाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व गडदुर्ग इस्लामी अतिक्रमणांपासून मुक्त करावेत ! – नितीन शिंदे, माजी आमदार आणि निमंत्रक, शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन

सरकारने अन्य गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून त्यांना इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त करावे आणि सर्व गडदुर्गांना गतवैभव प्राप्त करून द्यावे.

सत्पुरुषांच्या संकल्पामुळेच प्रतापगड आंदोलनाला यश !

हिंदूंनी इच्छाशक्ती दाखवून सर्व गडदुर्ग शुद्ध आणि पवित्र करावेत ! शिंदे-फडणवीस शासनाची राजकीय इच्छाशक्ती आणि सुधीर मुनगंटीवार यांचे नियोजनकौशल्य यांमुळे हे कार्य पार पडले. आता आपण हिंदूंनीही इच्छाशक्ती दाखवून सर्व गडदुर्ग शुद्ध आणि पवित्र केले पाहिजेत.

‘हलाल’ला झटका !

देशात जेथे जेथे अशा परिषदा होतील, तेथे वैध मार्गांनी विरोध केला पाहिजे. हा कार्यक्रम रहित झाला, म्हणजे सगळे संपले असे नाही, जोपर्यंत भारतात हलालचे प्रमाणीकरण करणारी व्यवस्था निरस्त होत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहिला पाहिजे. आवश्यकता आहे ती आपण सर्वांनी कृतीशील होण्याची !

हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात आंदोलन – एक राष्ट्रीय कर्तव्य !

१२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबईत होणार्‍या आंतरराष्ट्रीय हलाल परिषदेला दिलेली अनुमती रहित करावी. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, ही अपेक्षा आहे. अन्यथा भविष्यात ब्रह्मदेवसुद्धा आपल्याला वाचवू शकणार नाही. यापेक्षा अधिक सांगणे न लगे !

फाळणीमुळे देशाबाहेर गेलेल्या शक्तीकेंद्रांना पुन्हा भारतात आणायचे आहे ! – रामेश्‍वर शर्मा, आमदार, भाजप, मध्यप्रदेश

आज हिंदूंसमोर अनेक समस्या आणि मागण्या आहेत; पण आता वेळ थोडा आहे. या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी ‘भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित व्हायला हवा’, ही मागणी लावून धरली, तर सर्व समस्यांचे निराकरण निश्‍चित होईल.

‘हिंदु युवा वाहिनी’कडून बदलापूर ते अंबरनाथ भव्य कावळ पदयात्रा पार पडली !

‘हिंदु युवा वाहिनी’कडून बदलापूर ते अंबरनाथ अशी भव्य कावळ पदयात्रा नुकतीच काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये सर्व हिंदु संघटनांचे सदस्य, पदाधिकारी, हिंदु युवा वाहिनीचे सदस्य, तसेच बदलापूर आणि अंबरनाथ येथील शिवभक्त यांनी भगवे वस्त्र परिधान करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील मशिदीवरील भोंगे बंद करण्यात यावेत !

मशिदीवरील भोंग्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत आहे. त्यामुळे भोंगे बंद करण्याविषयी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, तसेच तुळजापूर खुर्द येथील सभागृहावरील ‘मशीद’ हे नाव हटवण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन ‘शिवबाराजे प्रतिष्ठान’च्या वतीने तहसील कार्यालयात देण्यात आले.

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष यांच्या वतीने चोपडा येथे प्रशासनास निवेदन !

राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदूची धार्मिक द्वेषातून अमानुष हत्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, या मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन चोपडा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष यांच्या वतीने प्रशासनास देण्यात आले. निवेदन नायब तहसीलदार सचिन बांबळे यांनी स्वीकारले.

VIDEO : सर्व संत आणि महात्मे यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक ! – पू. परमात्माजी महाराज, धारवाड, कर्नाटक

जेव्हा धर्मावर अधर्म वरचढ झाला, तेव्हा भगवान परशुरामाने परशू धारण केला. अशा परशुरामाला आपण आदर्श मानले पाहिजे. ही तपस्या करण्याची नव्हे, तर युद्ध करण्याची वेळ आहे.

(म्हणे) ‘श्रीकृष्णाचे तरुणपणी महिलांशी अनैतिक संबंध होते !’

नूपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित अवमान करणारे विधान केल्यावर जगभरातील मुसलमान आणि त्यांच्या देशांनी तात्काळ विरोध केला, तर हिंदूंच्या धर्माविषयी एका हिंदूने असे विधाने करूनही भारतातील समस्त हिंदू, त्यांचे नेते आणि संघटना गप्प आहेत !