‘अटक ते कटक’ हा नकाशा भारतियांच्या स्वाभिमानाचा विषय !
महाराष्ट्र हा केवळ भूप्रदेश नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व, धर्मवीर संभाजी महाराज यांचे बलीदान म्हणून तो भारताच्या स्वाभिमानाचा विषय आहे. मराठा साम्राज्याचा ‘अटक ते कटक’ हा ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (एन्.सी.ई.आर्.टी.च्या) पुस्तकातून हटवलेला नकाशा पुन्हा समाविष्ट झालाच पाहिजे,’ अशी भूमिका सातारा गादीच्या प्रतिनिधी छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी मांडली.