Kargil War Anniversary : पाकपुरस्‍कृत आतंकवाद्यांचे मनसुबे कधीच यशस्‍वी होणार नाहीत ! – पंतप्रधान मोदी

मी आतंकवाद्यांना सांगू इच्‍छितो की, त्‍यांचे ‘नापाक’ मनसुबे कधीच यशस्‍वी होणार नाहीत, अशी चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.  कारगिल युद्धाच्‍या २५ व्‍या विजय दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमाच्‍या वेळी पाकपुरस्‍कृत आतंकवाद्यांना चेतावणी देतांना पंतप्रधान मोदी यांनी हे वक्‍तव्‍य केले.  

Maulana Tauqeer Raza : २३ हिंदु तरुण आणि तरुणी यांचे धर्मांतर करून त्यांचे मुसलमानांशी लग्न लावण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला !

हिंदुत्वनिष्ठांनी विरोध केल्यावर जागे झालेले प्रशासन काय कामाचे ? भारतात पोलीस आणि प्रशासन यांनी हिंदूंना वार्‍यावर सोडले आहे. त्यामुळे भविष्यात हिंदूंवर काही संकट ओढवले, तर पोलीस अन् प्रशासन यांच्यावर अवलंबून रहाणे, हे हास्यास्पद ठरेल !

खलिस्तानी आतंकवादी भारताचीच नव्हे, तर कॅनडाचीही हानी करत आहेत ! – खासदार चंद्र आर्य, कॅनडा

भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी कॅनडाच्या संसदेला खलिस्तानी आतंकवाद्यांनी हवेत उद्ध्वस्त केलेल्या विमानाची आठवण करून दिली. ते म्हणाले, ‘खलिस्तानी आतंकवादी भारताचीच नव्हे, तर कॅनडाचीही हानी करत आहेत.’

Denigration Of Lord ShriRam : (म्हणे) ‘श्रीराम आणि पांडव त्यांच्या वडिलांपासून जन्मलेले नाहीत !’ – प्रा. के.एस्. भगवान

हिंदु सहिष्णु आहेत. यामुळेच हे लोक हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अशा प्रकारचे विधान करू धजावतात; या उलट अन्य धर्मियांच्या संदर्भात कुणी अशी विधाने केली, तर थेट ‘सर तन से जुदा’चा फतवा काढला जातो !

वाराणसी येथे ‘अखिल भारतीय सनातन न्यासा’च्या वतीने आयोजित रामकथेमध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

अखिल भारतीय सनातन न्यासाच्या वतीने रामकथेचा प्रारंभ हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, काशीविश्वनाथ मंदिर प्रभागाचे अध्यक्ष प्रा. नागेंद्र पांडेय आणि अन्य संतवृंदांच्या वतीने दीपप्रज्वलनाने करण्यात आला.

श्रीमान योगी असलेल्या शिवरायांची साधना देशभक्तीची होती ! – भय्याजी जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

छत्रपती शिवाजी महाराज हे एकमात्र राजा होते, ज्यांना ‘श्रीमान योगी’ म्हटले जाते. त्यांची साधना देशभक्तीची होती, तर मातृभूमीची भक्ती त्यांनी केली. कर्मशील, विवेक, चारित्र्य अशा अनेक गुणांचा समुच्चय त्यांच्यामध्ये आढळतो

संगीत उपासक गुरुवर्य उदयकुमार उपाध्ये यांचा अमृत महोत्सव सोहळा वसई (जिल्हा पालघर) येथे उत्साहात साजरा !

प.पू. (कै.) आबा उपाध्ये आणि प.पू. (कै.) (सौ.) मंगला उपाध्ये यांचे सुपुत्र अन् वसई येथील ‘समाज मंदिर ट्रस्ट’च्या संगीतवर्गाचे गुरुवर्य उदयकुमार उपाध्ये यांचा अमृत महोत्सव सोहळा येथील समाज मंदिर ट्रस्टच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.

ज्ञान हाच भारतीय जीवनाचा मूलाधार ! – श्रीमती इंदुताई काटदरे, पुनरुत्थान विद्यापीठ, कर्णावती

भारत देशात पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण केले जात असल्यामुळे येथील ज्ञान प्रदूषित झाले आहे. वर्तमान परिस्थितीत भारताला ज्ञाननिष्ठ देश बनवण्यासाठी शास्त्रांचे मूळ सिद्धांत सर्वांसमोर आणले पाहिजेत.

‘Son of Hamas’ Mosab Hassan Yousef : आपण इस्लामशी लढलो नाही, तर जग धोक्यात येईल ! – मोसाब हसन युसेफ

हमासच्या संस्थापकाचा मुलगा हिंदुत्वनिष्ठ नसून मुसलमान आहे, तसेच तो हमासचा माजी आतंकवादीही आहे. तोच हे सांगत आहे. यावर भारतातीलच नव्हे, तर जगातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि इस्लामप्रेमी कदापि विश्‍वास ठेवणार नाहीत, हेही तितकेच खरे आहे !

स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव (जिल्हा पुणे) येथे ३ दिवसांचा कीर्तन महोत्सव !

केडगाव येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’च्या वतीने संत चोखामेळा यांची पुण्यतिथी, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त २८ ते ३० मे असे ३ दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.