योगतज्ञ रामदेवबाबा आणि अनिल अंबानी यांना दिलेल्या भूमींवर उद्योग कधी उभे रहाणार ? – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
योगतज्ञ रामदेव बाबांच्या पतंजली समूहाच्या ‘हर्बल अॅण्ड फूड पार्क’ला, तसेच उद्योगपती अनिल अंबानी यांना शासनाने नागपूर येथे दिलेल्या भूमीवर उद्योग कधी उभे रहाणार ?, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत १० मार्च या दिवशी प्रश्नोत्तरात उपस्थित केला.