आंदोलकांवरील कारवाईअभावी विरोधकांचा सभात्याग !

२ दिवसांपूर्वी विधानभवनात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नेत्यांनी आंदोलन केले होते. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांनी विधानसभेत केली होती…

मविआच्या आमदारांचे काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईच्या संदर्भात २५ मार्च या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन केले.

खासदार संजय राऊत यांच्या हक्कभंगावरून विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

विधीमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्याविषयी भाजपने संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभेत केलेल्या हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे. याविषयी २ दिवसांत चौकशी सभागृहात निर्णय देऊ, अशी घोषणा अध्यक्षांनी केली.

संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी सत्ताधार्‍यांचा गदारोळ !

संजय राऊत सत्ताधार्‍यांविषयी म्हणाले, ही बनावट शिवसेना आहे. डुप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नव्हे, हे चोरमंडळ आहे.

राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी मलनि:स्सारण प्रक्रिया चालू करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नाल्याचे पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी बांधकाम, तसेच अन्य उद्योगांसाठी करावे, असा आदेश औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात आला आहे. पाण्याचा पुनर्वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे ‘भविष्यात नद्यांचे प्रदूषण अल्प होईल.’

भिडेवाड्याला संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासाठी न्यायालयात मागणी करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या वेळी उत्तर देतांना एकनाथ शिंदे यांनी भिडेवाडा येथे स्मारक करण्याविषयी तेथील जागेचे मालक, विकासक आणि भाडेकरू यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार आहे. न्यायालयीन दाव्यांमुळे या जागेचे भूसंपादन प्रलंबित असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतरही कांद्याच्या खरेदीवरून विरोधकांचा सभागृहात गोंधळ !

मुख्यमंत्री उत्तर देत असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ‘शेतकर्‍यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे कि राजकारण करायचे आहे ?’, असा प्रश्न उपस्थित केल्यावर विरोधक जागेवर बसले.

‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या स्‍फूर्तीगीताने महाराष्‍ट्राच्‍या विधीमंडळ अधिवेशनाला प्रारंभ !

‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या गीताला राज्‍यगीताचा दर्जा मिळाल्‍यानंतर महाराष्‍ट्राच्‍या विधीमंडळाच्‍या दोन्‍ही सभागृहांत प्रथमच हे गीत वाजवण्‍यात आले. ‘वन्‍दे मातरम्’ आणि त्‍यानंतर ‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या गीताने विधीमंडळाच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला.

दुसर्‍या दिवशीचे विधीमंडळाचे कामकाज विलंबाने मिळत असल्‍याची विरोधी पक्षनेत्‍यांची तक्रार !

अधिवेशनाच्‍या दुसर्‍या दिवसाचे कामकाज रात्री १२ वाजता मिळते. एवढ्या विलंबाने विषय कळल्‍यानंतर त्‍याची माहिती घेण्‍यासाठी एवढ्या रात्री कुणाला उठवायचे ? कामकाज रात्री १० वाजेपर्यंत मिळाल्‍यास त्‍यावरील उत्तरे घेता येतील, अशा शब्‍दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहितीच्‍या सूत्राखाली…

विरोधी पक्षाच्‍या आमदारांमध्‍ये ‘देशद्रोही’ कोण आहे ? यावर मुख्‍यमंत्र्यांनी खुलासा करावा ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

विरोधी आमदारांमध्‍ये ‘देशद्रोही’ कोण आहे ? यावर मुख्‍यमंत्र्यांनी खुलासा करावा. मुख्‍यमंत्र्यांनी ज्‍या प्रकारची विधाने केली, त्‍यातून हे राज्‍य सरकार खरोखरच ‘महाराष्‍ट्रविरोधी’ वाटू लागले आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्‍हटले.