उघड्यावर कचरा टाकणार्यांवर कडक कारवाई करण्याची सिद्धता !
उघड्यावर कचरा टाकणे रोखण्यासाठी बैठक झाली, हे चांगले झाले; पण प्रत्यक्ष कार्यवाही होईल तो सुदिन असेल !
उघड्यावर कचरा टाकणे रोखण्यासाठी बैठक झाली, हे चांगले झाले; पण प्रत्यक्ष कार्यवाही होईल तो सुदिन असेल !
न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणात असे प्रश्न समाविष्ट आहेत ज्यांचा निर्णय केवळ संपूर्ण खटल्याच्या वेळी पुराव्यांची पडताळणी केल्यानंतरच केला जाऊ शकतो. प्रारंभीच्या टप्प्यात हे ठरवले जाऊ शकत नाही. त्यामुळे गुन्हा रहित केला जाऊ शकत नाही.
आफ्रिका खंडातील केनिया देशामध्ये ‘हलाल प्रमाणपत्रा’वरून कायदेशीर वाद चालू आहे. १६ एप्रिल २०२६ या दिवशी डेनिस नथुम्बी, डेनिस ओवुओर ओचांडा आणि हेन्री बरासा टॉम यांनी नैरोबी उच्च न्यायालयात एक याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणण्यानुसार आरोपींनी फसवणूक करून एका स्थानिक कुटुंबाचे कायदेशीर कूळहक्क (टेनन्सी राइट्स) हिरावून घेतले. या प्रकरणी प्रारंभी पणजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता आणि त्यानंतर या प्रकरणाचे अन्वेषण सुरु झाले.
बांदा येथील ७ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी ‘पॉक्सो’ न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासह २० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला. न्यायालयाने दंडाची ही संपूर्ण रक्कम पीडितेला देण्याचा आदेश दिला.
‘राजस्थानमध्ये अनधिकृतपणे किडनी रॅकेट चालवले जात होते. त्याचा छडा लावतांना त्यात स्थानिक आरोपींसह बांगलादेशातील नुरूल इस्लाम आणि अहसुनुल कोबीर यांचाही सहभाग उघडकीस आला होता. हे दोघे बांगलादेशातून ‘व्हिसा’ घेऊन भारतात आले होते.
वीरेंद्रदादा सेवेत कितीही व्यस्त असले, तरी त्यांना नामजप करण्याची पुष्कळ तळमळ आहे. ते त्यांच्या व्यस्त नियोजनातूनही नामजप आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यासाठी वेळ काढतात.
मुंढवा परिसरातील १ सहस्र ८०० कोटी बाजारमूल्याच्या ४० एकर सरकारी भूमी व्यवहाराचा खरेदीखत (दस्त) पुणे न्यायालयाने रहित केला. ‘या व्यवहारात पैशांची देवाण-घेवाण झाली नाही.
शाळांमध्ये सरस्वती वंदना, गायत्री मंत्र, गुरुमंत्र आणि इतर हिंदु प्रार्थना यांचे पठण करण्याचे निर्देश देणार्या राज्य सरकारच्या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका छत्तीसगड उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली.
सिकेरी नदीच्या उच्च भरती रेषेपासून सुमारे ५५ मीटर अंतरावर ‘व्हिला’ आणि जलतरण तलाव उभारण्यात आला आहे.