वेदांमधून मिळालेले विज्ञान पाश्‍चात्त्यांनी स्वतःच्या नावाने प्रसारित केले ! – एस्. सोमनाथ, अध्यक्ष, इस्त्रो

वेद हे विज्ञानाचे मूळ आहे; पण हे ज्ञान अरबस्तानातून पाश्‍चात्त्य देशांमध्ये पोचले आणि तेथील शास्त्रज्ञांनी स्वतःच्या नावाने त्याचा प्रचार केला, असा गंभीर आरोप भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रोचे) अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी केला आहे.

संस्कृत पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याची हिंदु जनजागृती समितीची शासनाकडे मागणी !

संस्कृत भाषेच्या उत्कर्षासाठी दिल्या जाणार्‍या ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराच्या रकमेत सन्मानजनक वाढ करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली.

‘महाकवी कालिदास संस्‍कृत साधना’ पुरस्‍काराच्‍या रकमेत वाढ करावी ! – सुनील घनवट, राज्‍य संघटक, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड

महाराष्‍ट्र शासनाकडून संस्‍कृत भाषेचा प्रचार-प्रसार करण्‍यासाठी संस्‍कृत पंडित, वेदमूर्ती, संस्‍कृत शिक्षक, संस्‍कृत प्राध्‍यापक, संस्‍कृत भाषेसाठी काम करणारे कार्यकर्ते यांना ‘महाकवी कालिदास संस्‍कृत साधना’ पुरस्‍कार प्रदान केला जातो. मागील १० वर्षांत या पुरस्‍काराच्‍या रकमेत १ रुपयाचीही वाढ करण्‍यात आलेली नाही.

संस्कृत राजभाषा घोषित करा ! – माजी सरन्यायाधीश शरद बोबडे

संस्कृत ही ईश्‍वरनिर्मित भाषा असून त्याला ‘देवभाषा’ म्हटले जाते. गेली लक्षावधी वर्षे या भाषेचा उपयोग सनातन हिंदु धर्मीय करत आले आहेत. एक माजी सरन्यायाधीश अशी मागणी करत असतांना केंद्र सरकारने त्याचा गांभीर्याने विचार करावा, असेच संस्कृतप्रेमींना वाटते !

संस्कृत भाषेला लुप्त होण्यापासून वाचवा !

‘ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. वर्ष २०२३ ची भारतीय जनगणना शेवटच्या टप्प्यात आहे. जनगणना अधिकारी माहिती गोळा करण्यासाठी तुमच्या घरी येतील. तेव्हा ते तुम्हाला ‘मातृभाषेच्या खेरीज आणखी कोणत्या भाषा येतात ?’, असे विचारतील. या वेळी तुम्ही सनातनी हिंदु असल्याने कृपा करून ‘संस्कृत येते’, असे सांगण्यास विसरू नका.

संस्कृतला देशाची अधिकृत भाषा बनवा ! – माजी सरन्यायाधीश शरद बोबडे

देशाच्या एका माजी सरन्यायाधिशांनी अशा प्रकारचे विधान करणे, ही मोठी गोष्ट आहे. केंद्र सरकारने याविषयी गांभीर्याने विचार करावा, असे धर्माभिमानी हिंदूंना वाटते !

केरळमधील इस्लामी शैक्षणिक संस्थेमध्ये हिंदु धर्मग्रंथ शिकवण्यात येणार !

अकरावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात संस्कृत व्याकरणासह  संस्कृत भाषेच्या अंतर्गत श्रीमद्भगवद्गीता आणि अन्य हिंदु धार्मिक ग्रंथ यांचा समावेश करण्यात आला आहे.

संस्‍कृत भाषा ही भारतीय संस्‍कृतीचा पाया आहे ! – जयश्री साठे, ज्‍येष्‍ठ संस्‍कृत प्राध्‍यापिका

संस्‍कृत भाषा अतिशय समृद्ध आहे. या भाषेमध्‍ये अपार ग्रंथसंपदा आहे. संगीत, नाट्य या कला संस्‍कृत साहित्‍याने समृद्ध आहेत. संस्‍कृत भाषा ही भारतीय संस्‍कृतीचा पाया आहे.

संशोधनाला हवी साधनेची दृष्टी !

भारतात आजही गुणवत्ता आणि प्रज्ञा यांची कमतरता नाही. वेद, उपनिषदे, ऋषींचे ग्रंथ यांमध्ये अनेक गूढ सूत्रे आहेत, या सूत्रांमध्ये नवनिर्मितीची काही रहस्ये आहेत. काही श्लोक ज्यामध्ये विमान निर्मितीचे तंत्रज्ञान होते, ते काळाच्या पोटात गुप्त झाले आहेत.

संस्कृत व्याकरणकार पाणिनीच्या ‘अष्टाध्यायी’ भाषा ग्रंथातील नियमांचे कोडे सोडवण्यात भारतीय विद्यार्थाला यश !

‘अष्टाध्यायी’मधील व्याकरणाच्या संदर्भातील एक चूक अमेरिकेतील केंब्रिज विद्यापिठात ‘पी.एच्.डी’चे शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी डॉ. ऋषी राजपोपाट यांनी सुधारली आहे.