‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ‘हिमनगाचे टोक’ ?
मे २०२६ मध्ये झालेल्या ‘नीट यूजी’ परीक्षेची (राष्ट्रीय पात्रता परीक्षेची) प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्यानंतर देशभरात एकच गोंधळ उडाला. याचे अन्वेषण करता-करता अन्वेषण यंत्रणांनाही कल्पना नव्हती, असे समाजाला सुसंस्कृत करणार्या शिक्षणव्यवस्थेचा बिभत्स चेहरा जगासमोर आला.