ओटीटी अॅप्सवर नियंत्रण ठेवण्याचा सरकार विचार करत आहे !
ओटीटी अॅप्सवरील वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान करण्यात येत असून हा प्रकार गेले अनेक मास चालू आहे. अनेक संघटना याचा विरोध करत असतांना सरकार अजून विचारच करत आहे, हे राष्ट्रप्रेमी आणि हिंदु धर्मप्रेमी यांना अपेक्षित नाही !
नाशिक येथे होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव करावा !- सावरकरप्रेमी
स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, कादंबरीकार असून त्यांनी अद्वितीय कामगिरी केली आहे.
(म्हणे) ‘उत्तरप्रदेश विधान परिषदेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र हटवा !’ – काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांची मागणी
शिळ्या कढीला उकळी देण्याचा काँग्रेसचा नेहमीचा प्रयत्न ! काँग्रेसवाल्यांना सावरकर आजन्मात कळणार नाहीत आणि ते अशा प्रकारची हास्यास्पद मागणी करत रहातील !
केंद्र सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करणार !
नेताजी बोस यांची जयंती केवळ ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी न करता प्रत्यक्षात पराक्रम करून दाखवणे, हीच त्यांना खरी मानवंदना ठरील !
प्रभु श्रीराम म्हणजे राष्ट्रदेव ! – भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल
प्रभु श्रीराम हे हिमालयाप्रमाणे धैर्यवान, तर सागराप्रमाणे गंभीर आहेत. राष्ट्राला एकसंध बांधण्याचे काम प्रभु श्रीरामांनी केले आहे. ते केवळ श्रीराम नाहीत, तर आपल्या सर्वांसाठी राष्ट्र आहेत, तसेच ते आपले राष्ट्रदेव आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी १५ जानेवारी या दिवशी येथे केले.
भारतीय संस्कृतीचे मूर्तीमंत रूप म्हणजे स्वामी विवेकानंद ! – प्रा. अरुण मर्गज
विवेकानंदांचा भारतीय अध्यात्मावर श्रद्धा असलेला विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा मानवतावाद, त्याचे वैश्विक सत्य, धर्माची ओळख करून देणारे तत्त्वज्ञान आणि सर्वांगीण विकासाचे शिक्षण देणारे, ते खरे शिक्षण !
स्वामी विवेकानंद यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
आज स्वामी विवेकानंद यांची आज जयंती (दिनांकानुसार) !
‘तरुणांनो, जर हे राष्ट्र जिवंत रहावं अशी आपली धडपड असेल, तर हे राष्ट्र पूर्णपणे हिंदु धर्माधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारलेले असले पाहिजे.’ -स्वामी विवेकानंद
जे.एन्.यू.ला ‘स्वामी विवेकानंद विश्वविद्यालय’ असे नाव द्या !
अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने थेट नाव पालटून ते घोषित केले पाहिजे ! हिंदुद्वेषी नेहरू यांचे नाव असलेल्या सर्वच संस्थांची नावे पालटून त्यांना हिंदूंच्या संतांची नावे देण्यात यावीत. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !