सनातनची ग्रंथमालिका : धार्मिक कृतींमागील शास्त्र

धार्मिक कृती योग्यरित्या आणि शास्त्र समजून केल्याने ती भावपूर्ण होऊन त्यातून चैतन्य मिळते. त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते.

अध्यात्म हे प्रायोगिक असल्यामुळे, त्यासंदर्भातील वाचलेल्या ज्ञानानुसार तत्परतेने कृती करा !

केवळ ग्रंथ वाचण्यात आयुष्य वाया घालवू नका, तर ग्रंथातील जे शिकण्यासारखे आहे, ते तत्परतेने कृतीत आणा.

जागे असतांना बाह्यमन, तर झोपेत अंतर्मन कार्यरत असते

झोपल्यावर बाह्यमन कार्यरत नसते. त्या वेळी अंतर्मन पूर्णतः कार्यरत असते. त्यामुळे झोपेत स्वप्न पडणे, झोपेत असंबद्ध विचार येणे इत्यादी अंतर्मनामुळे होते

सामूहिक गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची प्रतिज्ञा

‘आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्चय करतो.’

किती वेळा ग्रंथ वाचले याला महत्त्व नाही, तर त्यातल्या किती ओळी जीवनात अंगीकारता हे महत्त्वाचे !

भलेही एक उतारा (पॅराग्राफ) वाचा किंवा फारतर ४ ओळीच वाचा; पण वाचलेल्या वचनांचे चिंतन-मनन करून त्यांना जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करा. जर एक ओळही तुम्ही जीवनात अंगीकारली, तर ते वाचन सार्थक होईल.’

मांसाहार म्हणजे अभक्ष भक्षण (जे भक्षण्यास योग्य नाही ते) !

आपण ज्या प्राण्याचे मांस खाऊ त्या प्राण्याचे स्वभाव-गुणधर्म आपल्यात उतरतात. थोडक्यात आपल्या वृत्तीत फरक पडतो. तमोगुणी अथवा रजोगुणी प्रवृत्ती जोपासली जाते.