साहित्य संमेलनाचे आयोजक आणि अध्यक्ष याची नोंद घेणार का ?

नाशिक – येथे होणार्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांंना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीचा ठराव मांडण्याची मागणी सावरकरप्रेमींकडून केली जात आहे. लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त आणि साहित्य संमलेनाचे आयोजक हेमंत टकले आणि अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांना सावरकरप्रेमींनी या मागणीचे निवेदनही दिले आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे येथील भगूरचे पुत्र असल्याने संमेलनाच्या प्रवेशद्वारास त्यांचे नाव देण्यात यावे, तसेच व्यासपिठावर सावरकरांची भव्य प्रतिमा असावी आणि तिचे पूजन करण्यात यावे’, असेही या निवेदनात म्हटले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, कादंबरीकार असून त्यांनी पोवाडे, काव्यसंग्रह, वार्तापत्रे, पुस्तकांचे अनुवाद, इतिहासलेखन अशी अद्वितीय कामगिरी केली आहे. मुंबई येथे झालेल्या ३८ व्या मराठी साहित्य संमेलनात त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत होणार्या साहित्य संमेलनात सावरकर साहित्याचा जागर होणे अपेक्षित आहे. सावरकरांच्या साहित्यावर परिसंवाद आयोजित करावा आणि त्यांच्या साहित्यकृतींचे प्रदर्शन मांडण्यात यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात आज चिपळूणमध्ये होणार्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !
Nagar Nigam Varanasi Decision : वाराणसीमध्ये आता मांस आणि मासे मिळणार नाहीत !
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त