सीता म्हणजे साक्षात् पावित्र्यच !

सीता म्हणजे मूर्तिमंत पावित्र्यच होते. आपल्या पतीविना अन्य कोणत्याही पुरुषाचा देहाला ती स्पर्श करीत नसे. ‘सीता शुद्ध आहे काय असे विचारता ? ती तर साक्षात् पावित्र्यच आहे’, असे राम म्हणाले.

सर्व शास्त्रे काल्पनिक समजणे हा खुळेपणा !

प्राचीन युद्धातील अस्त्रे आणि बाण यांच्या प्रभावी शक्ती या मंत्रसिद्ध होत्या. आपल्या सर्व शास्त्रांमधून हे सामर्थ्य गृहीत धरलेले आहे. आपण ही सर्व शास्त्रे काल्पनिक समजतो. ही आपली खुळी समजूत आहे.

हिंदूंच्या आजच्या स्थितीविषयी स्वामी विवेकानंद यांनी केलेले भाष्य

धार्मिक क्षेत्रातील शीघ्र गतीने झालेली प्रगती आणि सर्वच विषयांमध्ये सर्वाेत्कृष्ट भाव ग्रहण करण्याची प्रवृत्ती यांमुळे हिंदु लोक उच्च ध्येयांना चिकटून राहिले. त्यामुळे त्यांची आज अशी अवस्था झाली आहे.

हिंदूंचे अद्वैत मत 

बाह्यतः जाणिवेच्या कक्षेत आपण सर्व द्वैती आहोत; परंतु त्या पलीकडे काय ? त्या पलीकडे आपण अद्वैती आहोत. वस्तूतः हेच सत्य आहे. अद्वैत मत सांगते की, प्रत्येक व्यक्तीला आत्मरूप समजून तिच्यावर प्रेम करा.

स्वामी विवेकानंद यांनी भक्तीविषयी सांगितलेली सूत्रे

भक्ती ही ज्ञान, कर्म आणि योग (राजयोग) या तिन्हींपेक्षा श्रेष्ठ आहे; कारण भक्ती हेच तिचे फल होय. भक्ती ही साधन आणि साध्य दोन्ही आहेत. 

प्रामाणिक धारणा आणि विशुद्ध हेतू यांचे महत्त्व !

जिथे प्रामाणिक धारणा आहे आणि जिथे विशुद्ध हेतू आहे, तिथे विजय हा ठेवलेलाच आहे. या दोहोंनी संपन्न असलेले लोक थोडेसेच जरी असले, तरी ते सर्व प्रकारच्या अडचणींवर निश्चित मात करून विजयी होतील, यात शंका नाही.

बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय

कुणाहीविषयी यत्किंचितही द्वेष न बाळगता आणि कुणाही व्यक्तीसंबंधी, समाजासंबंधी वा सांप्रदायासंबंधी कदापि कटू शब्द न वापरता सर्वच वर्गांच्या सेवेसाठी ‘उद्बोधन’ करून स्वतःला समर्पित करा.

आपण स्वतःसह ईश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे !

जो माणूस स्वतःच स्वतःची घृणा करतो, ‘त्याच्या पतनास आरंभ झाला’, असे समजावे आणि राष्ट्रालाही हेच सूत्र लागू आहे. स्वतःच स्वतःची घृणा न करणे, हेच आपले पहिले कर्तव्य होय; कारण आपल्याला जर उन्नत व्हायचे असेल…

स्वामी विवेकानंद यांचे युवकांना आवाहन !

  ‘उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत’ !, म्हणजे ‘ उठा ! जागे व्हा ! आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका !’

स्वामी विवेकानंदांप्रमाणे मातृभूमीविषयी प्रेम हवे !

मातृभूमी हा स्वामी विवेकानंदांच्या प्रेमाचा एकमेव विषय असायचा.