गुरुपौर्णिमेला १५ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला १५ दिवस शिल्लक

संन्याशांना ज्ञानयोगाने वैराग्य येते. काही जण वैराग्य पराकोटीला गेले की, संन्यास घेतात आणि घरदार सोडून फिरतात; मात्र हा संन्यास गुरूंनी दिला असेल, तरच घरदार सोडून गेल्याचा फायदा होतो. गुरूंशिवाय संन्यास घेऊन गेल्यास काही जण हिमालयात थंडीने किंवा इतरत्र उपासमारीने मरतातसुद्धा.

गुरुपौर्णिमेला १६ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला १६ दिवस शिल्लक

मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्यांची दयादृष्टी सर्वांवर सारखीच असते; पण जो शुद्ध अंतःकरणाने त्यांच्या ठिकाणी लीन असतो, त्याला श्रद्धेनुसार यथोचित फलप्राप्ती होते.

गुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्लक

शिष्याचे अज्ञान घालवून, त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी जे त्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूती देतात, त्यांना गुरु असे म्हणतात.

गुरुपौर्णिमेला १८ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला १८ दिवस शिल्लक

शिष्यात मुमुक्षुत्व असले, तर त्याच्या चुका झाल्या तरी गुरु त्याला सांभाळून घेतात. शिष्य कितीही अविचारी, हट्टी, अशिक्षित वा अयोग्य असला तरीही त्याला सांभाळून घेणे, हेच गुरूंचे खरे कौशल्य होय. शिष्य जरी गुरूंवर खूप रागावला असला, तरी गुरु मात्र त्याला सांभाळून घेतात. एका शिष्याने एकदा त्यांच्या गुरूंच्या छायाचित्रावर रागाने जोडे ठेवले, तरी ते त्याच्यावर रागावले नाहीत, तर त्याला पूर्वीसारखेच प्रेम दिले.

गुरुपौर्णिमेला १९ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला १९ दिवस शिल्लक

गंगेमुळे पाप, शशी (चंद्रा) मुळे ताप (मानसिक तणाव) आणि कल्पतरूमुळे दैन्य (दारिद्र्य) नाहीसे होते. याउलट श्री गुरुदर्शनाने पाप, ताप अन् दैन्य या तिन्ही गोष्टींचे हरण होते, म्हणजेच हे तिन्ही त्रास दूर होतात. – श्री गुरुचरित्र १३:१३०