गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक

मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते.

गुरुपौर्णिमेला १५ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला १५ दिवस शिल्लक

संन्याशांना ज्ञानयोगाने वैराग्य येते. काही जण वैराग्य पराकोटीला गेले की, संन्यास घेतात आणि घरदार सोडून फिरतात; मात्र हा संन्यास गुरूंनी दिला असेल, तरच घरदार सोडून गेल्याचा फायदा होतो. गुरूंशिवाय संन्यास घेऊन गेल्यास काही जण हिमालयात थंडीने किंवा इतरत्र उपासमारीने मरतातसुद्धा.

गुरुपौर्णिमेला १६ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला १६ दिवस शिल्लक

मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्यांची दयादृष्टी सर्वांवर सारखीच असते; पण जो शुद्ध अंतःकरणाने त्यांच्या ठिकाणी लीन असतो, त्याला श्रद्धेनुसार यथोचित फलप्राप्ती होते.

गुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्लक

शिष्याचे अज्ञान घालवून, त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी जे त्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूती देतात, त्यांना गुरु असे म्हणतात.