महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करावी ! – हिंदु जनजागृती समिती

अशी मागणी प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांनी करावी ! मुळात अशी मागणी हिंदूंना करण्यासही लागू नये, सरकारने ती स्वतःहून करून हिंदूंच्या सदिच्छा घ्याव्यात, असेच हिंदूंना वाटते !

प्रसिद्धीलोलूप तृप्ती देसाई यांच्यावर कडक कारवाई करा ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फलक काढण्यास गेलेल्या तृप्ती देसाईंना अटक करण्यात आली असली, तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार अरुणअण्णा लाड यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण अण्णा लाड यांनी विधानभवनात विधान परिषद सदस्यत्वासमवेत गोपनियतेची शपथ घेतली.

पैठण येथील संत ज्ञानेश्‍वर उद्यानाचा होणार कायापालट

संभाजीनगर जवळील पैठण येथील संत ज्ञानेश्‍वर उद्यानाचा संपूर्ण कायापालट करून देश-विदेशातील पर्यटकांना तेथे आकर्षित करण्यासाठी नागरिकांकडून नाविन्यपूर्ण कल्पना मागवा, तसेच जागतिक स्तरावरील सल्लागारही नियुक्त करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

अकाली दलाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी खासदार प्रेमसिंग शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

तमिळनाडू येथील जिंजी किल्ल्याचे जतन आणि संवर्धन यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून ५० लाख रुपये घोषित

स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणार्‍या जिंजी किल्ल्यास खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असतांना त्यांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला होता.

जनतेच्या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

महाविकास आघाडी ही जनतेच्या विश्‍वासाच्या बळावर स्थापन झाली आहे. कितीही संकटे आली, तरी महाराष्ट्र घाबरला नाही आणि घाबरणार नाही. जनतेच्या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

महाविकास आघाडी ५ वर्षे चालेल ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राज्यशासनातील प्रत्येकजण समर्थपणे दायित्व निभावत असून हे शासन ५ वर्षे चालेल, असा विश्‍वास महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

मी हिंदु, धर्माचा प्रश्‍न येईल तेव्हा धर्माच्या बाजूने बोलेन !

मी कर्माने आणि धर्मानेही हिंदु आहे. हिंदुत्व हा माझ्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. मी हिंदु धर्माविषयी बोलू शकते; मात्र आतापर्यंत बोलण्याची आवश्यकता भासली नाही; मात्र जेव्हा धर्माचा प्रश्‍न येईल, तेव्हा हिंदु धर्माच्या बाजूने बोलेन, असे वक्तव्य अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले.

मुलींनी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडू नये; म्हणून त्यांना साधना शिकवून सात्त्विक करणे, हाच त्यावरील खरा उपाय आहे !

‘महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संतुलन राखण्यासाठी, तसेच विश्‍वासघातकी लोकांपासून मुली अन् महिला यांचे रक्षण व्हावे, यासाठी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करावा – भाजपचे नेते राज पुरोहित