लाखो वारकर्‍यांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात साजरा झाला देहू (पुणे) येथे तुकाराम बीज सोहळा !

संत तुकाराम महाराजांच्या ३७६ व्या बीज सोहळ्यासाठी लाखो वारकरी देहूमध्ये पोचले होते. भजनी दिंड्यांचा जागर, काकड आरती, महापूजा, हरिपाठ आणि वीणा, टाळ अन् मृदंग यांसोबत चिपळ्यांची साथ अशा भक्तीमय वातावरणामध्ये ‘तुकाराम बीज’ सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा झाला.

कीर्तनकारांनी सांप्रदायिक, सामाजिक कार्याच्या समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे ! – ह.भ.प. नरहरी महाराज, सचिव, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

हिंदु जनजागृती समिती समवेत मी गेली अनेक वर्षे कार्य करत आहे. अनेक मोहिमा वारकरी संप्रदाय आणि समितीने एकत्रितपणे राबवल्या अन् त्या यशस्वी झाल्या आहेत, असे मत महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे सचिव ह.भ.प. नरहरी महाराज यांनी व्यक्त केले.

वारकर्‍यांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा सत्कार !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’ला नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मान्यता देण्यात आली असून आता या योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांना अनुमाने २ सहस्र कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे,

प्रशासनाच्या आश्वासनानंतर ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’च्या वतीने होणारे ठिय्या आंदोलन आणि भजन आंदोलन स्थगित !

माघवारी २०२३ मध्ये जे वाटप करण्यात आले, त्याप्रमाणे वर्ष २०२४ मध्येही करण्यात आले. त्यामुळे यापुढील काळातही तसेच जागा वाटप करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले.

अखिल भाविक वारकरी मंडळाकडून पंढरपूर येथे सोमवारी ठिय्या आणि भजन आंदोलन ! – ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे

अखिल भाविक वारकरी मंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या संदर्भातील लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालय येथे देऊनही वारकर्‍यांना हा त्रास प्रत्येक ३ मासांनंतर होणार्‍या वारीसाठी सहन करावा लागत आहे

‘एम्.आय.डी.सी.’च्या वतीने पुढील ५ वर्षे १० लाख रुपये मराठी संत साहित्य संमेलनासाठी देणार !- पालकमंत्री उदय सामंत

वारकरी संप्रदायाचा विचार  ज्याने ज्याने घेतला, तो जगात नावारूपाला आला. ते विचार जपले पाहिजेत, भक्त पुंडलिकाप्रमाणे आई-बापांची सेवा मुलांनी केली पाहिजे.

भाजप आध्यात्मिक आघाडीद्वारे १५ फेब्रुवारीपासून राज्यभरात संत-महंतांचे मेळावे ! – आचार्य तुषार भोसले, प्रमुख, भाजप आध्यात्मिक आघाडी

महाराष्ट्रातील वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, तसेच वारकरी संप्रदाय, रामदासी, स्वामी समर्थ परिवार, तुकडोजी महाराज परिवार, गायत्री परिवार, श्री सेवक परिवारासह कीर्तनकार, प्रवचनकार, साधू-संत, महंताशी समन्वय आणि संपर्क ठेवण्यात आला आहे.

इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ह.भ.प. मोहनानंद महाराज पुरंदवाडकर यांचे उपोषण !

येथे येणारे भाविक इंद्रायणी नदीत श्रद्धेने स्नान करतात, तसेच हे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. प्रत्यक्षात मात्र इंद्रायणी नदीचे पाणी येथील नागरिक आणि देहू-आळंदी येथे येणार्‍या भाविकांच्या आरोग्यास धोकादायक बनले आहे

प्रभु श्रीरामचंद्राविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे बांडगुळ ! – आचार्य प्रल्हाद महाराजशास्त्री

संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि राज्यस्तरीय अखंड हरिनाम महोत्सव आणि श्रीमलंगगड हरिनाम महोत्सव समितीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

ममदापूर (अहिल्यानगर) येथील पशूवधगृह बंद करून कारवाईची नगर पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी !

ममदापूर (अहिल्यानगर) येथे पशूवधगृहातील कसायांवर कारवाई करण्यासाठी गेलेले बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी यांच्यावर काही धर्मांधांच्या जमावाकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आले होते. यामधे एक तरुण आणि पोलीस अधिकारी गंभीर घायाळ झाले.