आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी केली वाखरी पालखी तळ, भक्तीसागर आणि नदीपात्र यांची पहाणी !

आषाढी शुक्ल एकादशी सोहळा ६ जुलै या दिवशी होत आहे. या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्यासमवेत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात.

काडवली (खेड) येथे कोकणातील पहिली वारकरी शाळा बांधणार !

शाळेतील विद्यार्थ्यांना पारंपरिक आणि आधुनिक शिक्षणाचा संगम साधत, मृदंग, तबला, हार्मोनियम, गायन, भजन, कीर्तन, संगणक प्रशिक्षण, सूत्रसंचालन आणि संवाद कौशल्य यांचेही शिक्षण दिले जाणार आहे.

पालखी सोहळा काळात वारकर्‍यांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी शासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी ! – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

वारकर्‍यांची कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

आज नागपूर येथे पंढरपूर ते लंडन आंतरराष्‍ट्रीय दिंडीचे आगमन !

काही वर्षांत पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर लंडन म्हणजेच युके येथे भव्यदिव्‍य स्‍वरूपात साकारले जाणार आहे. यानिमित्ताने १५ एप्रिल या दिवशी पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघाली आहे.

चैत्री यात्रेसाठी मंदिर प्रशासन सज्ज; मंदिर समितीची जय्यत सिद्धता ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

सोलापूर महानगरपालिका यांच्याकडील ‘रेस्क्यू व्हॅन’ प्रशिक्षित कर्मचार्‍यांसह, अग्नीशमन यंत्रणा, धातू शोधणारे यंत्र, भ्रमणभाष लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, अपघात विमा यांसह अन्य व्यवस्था करण्यात आली आहे.

चुकीच्या प्रवृत्तींमुळे वारकरी संप्रदायाची नाहक अपकीर्ती होत आहे ! – अक्षय महाराज भोसले

आळंदी क्षेत्रातील काही वारकरी शिक्षणसंस्थेत काही चुकीचे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. संबंधित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी.

शालेय पोषण आहारातून अंडी देण्याचा निर्णय रहित !

वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती यांनी पत्रकार परिषद घेऊन पोषण आहारातून अंडे रहित करण्याची मागणी केली होती.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे भाविकांनी दिलेले दान मंदिर निर्माणासाठी वापरले जाणार !

त्र्यंबकेश्वर येथे वारकरी संवाद कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी बांधवांशी संवाद साधला !

संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प. गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन !

आळंदी येथे २१ जानेवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आधुनिक वैद्यांनी मृत म्हणून घोषित केल्यानंतरही हरिनामाचा जप करणारे वारकरी पांडुरंगतात्या उलपे परत जिवंत !

कोल्हापूर जिल्हा हा विशेष करून पुरोगामी असल्याचे सांगितले जाते. अशा जिल्ह्यातच ईश्वराच्या भक्तीने आणि नामजपाने काय होऊ शकते ? त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पांडुरंगतात्या होय !