गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
आषाढी एकादशीच्या पूर्वी हे वारकरी सुमारे ३५० कि.मी. अंतर सुमारे १४ दिवस पायी चालून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला पोचणार आहेत. गोव्यात सुमारे २० वर्षांपूर्वी पंढरपूर येथे वारीला जाण्याच्या परंपरेला प्रारंभ झाला आणि यंदा ४० हून अधिक दिंडी पथके वारीमध्ये सहभागी झाली आहेत.