महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस यांसह भाजपच्या ३ नेत्यांच्या अटकेचा कट ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे आणि स्वत:मध्ये वाद निर्माण होण्यामागील कारण सांगतांना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना मला ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावले गेले आणि १ घंटा वाट पहायला लावली. असे २ वर्षे सातत्याने होत होते.

प्रचारगीतामधून ‘जय भवानी’ उल्लेख हटवणार नाही ! – उद्धव ठाकरे  

‘जय भवानी, जय शिवाजी’ ही आमची घोषणा आहे. घोषणेतील ‘जय भवानी’ शब्द काढल्यावर भविष्यात ‘जय शिवाजी’ उल्लेख काढायला लावाल. अशी हुकूमशाही पद्धत आम्ही स्वीकारणार नाही.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची नावे घोषित !

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुंबईमध्ये काँग्रेसला उमेदवारी न मिळाल्यामुळे अप्रसन्नता व्यक्त केली आहे. मुंबईतील जागांविषयी महाविकास आघाडीमध्ये अद्याप निर्णय व्हायचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Omar Abdullah Maharashtra Bhavan : (म्हणे) ‘आमची सत्ता आल्यावर जम्मू-काश्मीरमधील महाराष्ट्र भवन बंद करू !’ – ओमर अब्दुल्ला

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हे मान्य आहे का ? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रश्‍न

हिंदु धर्माची शक्ती संपवणारा अजून जन्माला आलेला नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

१७ मार्च या दिवशी मुंबईत ‘शिवाजी पार्क’मध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता सभा झाली. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

स्वा. सावरकरांना ‘माफीवीर’ म्हणणार्‍या राहुल गांधी यांना उद्धव ठाकरे यांनी क्षमा मागण्यास सांगितले पाहिजे ! – रणजित सावरकर, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

राहुल गांधी यांनी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला होता, त्या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते, ‘‘यांना जोड्याने मारले पाहिजे.’’ आता कमीतकमी त्यांना क्षमा मागण्यास तरी त्यांनी सांगितले पाहिजे.

पुत्र आणि कन्या यांच्या मोहामुळे शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

आम्ही कुठलाही पक्ष फोडला नाही. पुत्र आणि कन्या यांच्या मोहामुळे शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले, हेच वास्तव आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.

‘भ्रष्टाचारी अभय योजना’ ही नवीन योजना आहे का? – उद्धव ठाकरे

पंतप्रधान मोदी यांच्या नावाने अनेक योजना चालू आहेत. तशी त्यांनी आता नवीन ‘भ्रष्टाचारी अभय योजना’ काढली आहे. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांनी भाजपमध्ये यावे.

शिवसेना आमदार पात्र-अपात्रतेच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने मागवली कागदपत्रे !

एकनाथ शिंदे यांची बाजू मांडतांना ज्येष्ठ अधिवक्ता हरिश साळवे यांनी उद्धव ठाकरे यांनी सादर केलेली कागदपत्रे विश्वासार्ह नसल्याचे म्हटले.

हिंदुत्वावरून उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खात्रीने एकत्र येतील ! – आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना

माझे अनुमान चुकणार नाही. हिंदुत्वाच्या सूत्रावरून उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खात्रीने एकत्र येतील, असा विश्वास शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केला आहे.