राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना ‘राज्यस्तरीय’ पक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवावी लागणार !

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचा दर्जा आणि निवडणूक चिन्ह यांविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून राज्यस्तरीय पक्ष म्हणून दर्जा दिला आहे,..

आमदार जितेंद्र आव्हाड, २ अधिवक्ते यांसह २३ आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद !

स्वतःवर नोंद झालेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पीडित महिला रिदा रशीद हिच्याविरुद्ध षड्यंत्र रचले होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : शरद पवार गटाच्या आव्हानाला उत्तर द्या !; दादर येथे दूध चोरणार्‍याला पकडले !

राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्याविरोधात शरद पवार गटाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

राष्ट्रवादीशी युती हे निवडणुकीतील भाजपच्या अपयशाच्या हिमनगाचे टोक ! – साप्ताहिक विवेक

‘कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश आहे, हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले, तरी तेवढेच कारण नसून ते केवळ हिमनगाचे टोक आहे’, अशा शब्दांत ‘विवेक’ साप्ताहिकामधून भाजपच्या पराभवाचे विश्लेषण करण्यात आले आहे.

(म्हणे) ‘द्वेषपूर्ण वक्तव्य करून भावना भडकावणार्‍यांची यंत्रणांनी नोंद घ्यावी !’ – इद्रिस नायकवडी, राष्ट्रवादी काँग्रेस

वक्फ मंडळाला दिलेल्या निधीविषयी मराठी अभिनेत्री केतळी चितळे हिने केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी !

बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

सर्व ठिकाणचे गुन्हे एकत्र करून खटला चालवा ! – जितेंद्र आव्हाड यांची मागणी

प्रभु श्रीराम शाकाहारी नव्हते, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यात विविध ठिकाणी ७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

अत्यंत चुरशीच्या लढतीत बीडमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे विजयी !

पराभवानंतर पत्रकारांशी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘माझ्या आयुष्यातील सर्वांत विचित्र, वेगळी अशी ही निवडणूक होती. मी जेव्हा मतमोजणी केंद्राच्या बाहेर आले, तेव्हा समोरील जमाव फारच आक्रमक होता.”

पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वर्चस्व !

ज्या लढतीकडे राज्याचेच नाही, तर देशाचे लक्ष होते, ती लढत म्हणजे बारामती येथील अजित पवार यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. सुनेत्रा पवार आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्यात झाली.

भारतीय न्यायाधिशांच्या दृष्टीकोनातून ‘मनुस्मृती’चे महत्त्व !

मनुस्मृतीनुसार कोणतीही व्यक्ती अख्ख्या १०० वर्षांत त्याच्या आई-वडिलांच्या सर्व त्रासांची परतफेड करू शकत नाही, जे त्यांनी त्याला जन्म दिल्यापासून प्रौढ होईपर्यंत सहन केलेले असतात.