महाराष्‍ट्र सरकारकडून ‘मुख्‍यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने’ची घोषणा !

शेतकर्‍यांना साहाय्‍य करण्‍यासाठी आणि त्‍यांची थकबाकी वाढू न देण्‍याच्‍या उद्देशाने राज्‍यशासनाने ‘मुख्‍यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ चालू केली आहे.

जुलैपर्यंत ९० लाख ४८ सहस्र शेतकर्‍यांच्या खात्यात २ सहस्र रुपये जमा ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्रातील ९० लाख ४८ शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २ सहस्र रुपये जमा होणार आहेत. यासाठी महाराष्ट्रात १ सहस्र ८४५ कोटी १७ लाख रुपये इतका निधी वितरीत केला जाणार आहे.

सातारा येथे साखर कारखान्यांसाठी ऊस तोडणी वाहतूक आणि दलाली यांचे एकच दरपत्रक !

सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये संपूर्ण जिल्ह्यासाठी ऊस तोडणी वाहतूक आणि दलाली यांच्या (कमिशनच्या) एकाच निश्चित दरपत्रकास एकमुखी अनुमती देण्यात आली.

संपादकीय : शेतीप्रधान देशातील मागास शेतकरी !

शेतकर्‍यांसाठीच्या योजनांचा भविष्यात त्यांना त्याचा काय लाभ झाला, याकडे सरकारने लक्ष दिल्यास त्यातून छोट्या-मोठे सर्व शेतकरी आणि शेती यांची गुणवत्ता वाढू शकेल.

बोगस बियाणाच्या विरोधात ‘व्हॉट्सॲप’वरून तक्रार प्रविष्ट करता येणार ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

बोगस आणि चढ्या दराने बियाण्यांची विक्री केल्यास, तसेच खरेदीची अनावश्यक सक्ती केल्यास त्या विरोधात कृषी तक्रार व्हॉट्सॲप हेल्पलाईनच्या ९८२२४४६६५५ या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

पिंपळखुंटा (छत्रपती संभाजीनगर) येथे बँकेने कर्ज न दिल्याने शेतकर्‍याची आत्महत्या !

बँकेच्या शाखाधिकार्‍यांनी त्यांच्या खात्यावर पैसे ठेवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या नैराश्यातून दाभाडे यांनी आत्महत्या केली.

रत्नागिरी येथील सनातनचे साधक प्रमोद भडकमकर एस्.आर्.टी. कृषी सन्मान विशेष पुरस्काराने सन्मानित

मागील १० वर्षे सातत्याने एस्.आर्.टी. पद्धतीने भडकमकर कुटुंबीय लागवड करतात. भातासह नाचणी, वरी, पावटे, कुळीथ आदी पिके ते घेत आहेत. या पद्धतीमुळे जमिनीची धूप थांबते आणि सुपीकताही वाढते.

गाळमुक्त धरणाकडून गाळयुक्त शेतीकडे जातांना गाळाची प्रत पहाणे आवश्यक !

आपल्या देशामधील अर्ध्यापेक्षा अधिक कृषिक्षेत्र हे या सर्व धरणांच्या सिंचनावर अवलंबून आहे. यावरून धरणामधील गाळ, कृषी उत्पादन आणि जनतेची अन्नसुरक्षा हे तीनही विषय एकमेकांवर कसे अवलंबून आहेत, ते समजते.

हत्तींपासून गावाचे रक्षण करू न शकणारे पोलीस आणि सरकार !

दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील मोर्ले गावात ४ हत्तींच्या कळपाने केळी, सुपारी आणि नारळ यांच्या बागायतींसह शेतीसाठीच्या पाण्याची जलवाहिनी, तसेच कुंपण उद्ध्वस्त केले.

आचारसंहितेसाठी रासायनिक खतांच्या गोणीवरील पंतप्रधानांची छबी मिटवण्याचे कृषि विभागाचे आदेश

रासायनिक खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छापण्यात आलेल्या प्रतिमांमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याने कृषी विभागाने पंतप्रधान मोदी यांच्या गोण्यांवरील त्या छबीवर ब्रशद्वारे लाल रंग देऊन ती प्रतिमा खोडावी आणि नंतरच गोणी वितरीत करावी, अशा सूचना केली आहे.