मावळच्‍या (पुणे) शिळिंब गावातील भात शेतीतून श्री गणेशाची प्रदक्षिणा !

१०० वर्षांपूर्वीची ही परंपरा आजही शिळिंब गावाने जपली असल्‍याचे पहावयास मिळत आहे.

राज्‍यात सर्वत्र पावसाचा जोर !

या ४-५ दिवसांत मुसळधार पावसाची शक्‍यता भारतीय हवामान खात्‍याकडून वर्तवण्‍यात आली आहे. बंगालच्‍या उपसागरामध्‍ये अल्‍प दाबाचा पट्टा निर्माण झाल्‍याने हा पाऊस पडत आहे.

नाशिक जिल्‍ह्यातील २१३ गावांना ८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा !

गेल्‍या आठवड्यात जिल्‍ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नाशिक शहरासह जिल्‍ह्यात काही ठिकाणी पूरस्‍थिती निर्माण झाली. पावसामुळे स्‍थानिक स्‍तरावर पाण्‍याची उपलब्‍धता होईल आणि काही टँकर बंद होतील, अशी आशा होती

‘जी-२०’मध्ये जगन्नाथ मगर नैसर्गिक शेतीविषयीची यशोगाथा सादर करणार !

श्री. मगर यांनी शेतीमध्ये गायीचे शेण आणि गोमूत्र यांचा वापर केल्याने भूमीचा सेंद्रिय कर्ब वाढला.

कागल (जिल्हा कोल्हापूर) तालुक्यात दुष्काळ घोषित करा ! – ग्रामस्थांचे निवेदन

पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके, तर जनावरांच्या लंपी आजारामुळे दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. शासनाने शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, यांसाठी हेक्टरी १५ सहस्र रुपयांचे सहकार्य घोषित करावे

‘रत्नागिरी-८’ या भाताच्या वाणाची विक्रमी ८० टन विक्री

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ‘रत्नागिरी-८’ या बियाण्याची लागवड केली जाते. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी रत्नागिरी आणि फोंडा (सिंधुदुर्ग) केंद्रांवर मिळून ८० टन बियाण्यांची विक्री झाली.

केंद्रशासन महाराष्ट्रातील २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार !

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली होती. यामुळे केंद्र सरकारकडून कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आला.

मराठवाड्यात पावसाअभावी ३५ लाख हेक्‍टरवरील खरीपाची पिके धोक्‍यात !

अत्‍यल्‍प पावसामुळे मराठवाड्यातील खरीपाची उत्‍पादन क्षमता सरासरी ३५ ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत घटण्‍याचा अंदाज आहे. पुढील ८ दिवसांत मुसळधार पाऊस न झाल्‍यास ३५ लाख हेक्‍टरवरील संपूर्ण खरीप पिके धोक्‍यात येण्‍याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे.

केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य ! – मुख्‍यमंत्री

केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य करता आले, अशी माहिती राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते मंत्रालयात स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने ध्‍वजारोहण करण्‍यात आले. त्‍या प्रसंगी ते बोलत होते.

महाराष्‍ट्राचे वर्ष २०२४-२५ पर्यंत २ सहस्र ७९५ मेगावॅट सौर वीजनिर्मितीचे उद्दिष्‍ट !

राज्‍यात ५ प्रकल्‍पांची कामे वेगाने चालू आहेत. यामध्‍ये प्रत्‍येक प्रकल्‍पाची वीजनिर्मितीची क्षमता निश्‍चित करण्‍यात आली असून वर्ष २०२४-२५ पर्यंत टप्‍प्‍याटप्‍प्‍याने हे उद्दिष्‍ट पूर्ण करण्‍यात येणार आहे.