रत्नदुर्गावर पुन्हा भगवा फडकणार !

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा टेहळण्या बुरुजावर भगवा ध्वज फडकवण्यात येणार असून, महादरवाजाजवळ फलकही लावण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू

याविषयीचा फलक मंदिर परिसरात लावण्यात आला आहे. यावर ‘मंदिरात प्रवेश करतांना फाटकी जीन्स्, हाफपॅन्ट, स्कर्ट, घट्ट कपडे, मौजे, बूट किंवा हॅट (टोपी) घालून मंदिरात प्रवेश करणे टाळावे.

राजकोट (मालवण) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नवीन पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात

१९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी पुतळा उभारण्याच्या कामाची पायाभरणी करण्यात आली, तर ३ मार्चला प्रत्यक्ष पुतळा उभारणीच्या कामास प्रारंभ करण्यात आला.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

नाशिक येथील सप्तशृंगी गड परिसरातून ३ सहस्र किलो प्लास्टिक कचरा संकलित !

जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गड येथे सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी चैत्रोत्सवानिमित्त राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते.

जुलैमध्ये पॅरिस (फ्रान्स) येथे ‘जागतिक वारसा’ दर्जाप्राप्तीसाठी मतदान !

‘जागतिक वारसा’ दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी जगभरातील वास्तूंची नावे ‘युनेस्को’ला प्राप्त झाली आहेत. याविषयी मतदानाची प्रक्रिया जुलै २०२५ मध्ये फ्रान्स देशातील पॅरिस शहरात होणार आहे.

गोपाळगडावरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार !

गोपाळगड वर्ष १९६० मध्ये अवघ्या ३० रुपयांत शासनाने विकला होता. केवळ मुसलमानांची भूमी म्हणून गड कह्यात घेण्यास प्रशासन सिद्ध नव्हते ! त्यामुळेच दुर्गप्रेमींना आंदोलन करावे लागले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी प्रतिमहा ५० सहस्र रुपये देण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश !

मंदिरासह सिंधुदुर्ग गड आणि परिसराचा विकास करण्याची मागणी !

पुरातत्व विभागाकडील गड जतन करण्यासाठी राज्याकडे द्या !

महाराष्ट्रात राज्य पुरातत्व विभागाकडे ६२ गड-दुर्ग आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी राज्यशासन प्रयत्नरत आहे. केंद्रशासनाच्या अखत्यारित असलेले गड-दुर्गही राज्यशासनाकडे दिल्यास त्यांची डागडुजी आणि जतन अत्यंत प्रभावीपणे करता येईल.

पाली सुधागड येथे ‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात’ या मोहिमेअंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार २३ मार्च या दिवशी रायगडच्या पाली येथील सुधागड येथे मोहीम पार पडली. यात ३७ जणांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांच्या हिरवेकरणाचे षड्यंत्र केले उघड !

शिवकालीन गड-दुर्ग म्हणजे जिहादी धर्मांधांना पराभूत करून छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक आहे. या प्रतिकांतून हिंदूंना क्षात्र आणि धर्म तेज प्राप्त होते.