हिंदु धर्माची शक्ती संपवणारा अजून जन्माला आलेला नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

१७ मार्च या दिवशी मुंबईत ‘शिवाजी पार्क’मध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता सभा झाली. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

भारताला घटनात्मकरित्या ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापन करून संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार !

मुंबईतील वर्ष १९९२ आणि १९९३ च्या घटनांमधील पीडितांच्या वारशांना हानीभरपाई देणार !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने या दोन्ही घटनांतील मृत आणि बेपत्ता लोकांच्या वारसांना २ लाखांची हानीभरपाई जाहीर केली.सरकारने सर्व ९०० मृत आणि ६० बेपत्ता व्यक्तींच्या कायदेशीर वारशांना भरपाई दिली आहे.

राज्यात मानवाकडून मैला उचलण्याची कामे बंद ! यंत्राद्वारेच स्वच्छता होणार !

राज्यात ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. यासाठी ५०२ कोटी ४० लाख रुपये इतका निधी शासनाकडून संमत करण्यात आला आहे.

काँग्रेसमध्ये नेहरू घराण्यातील व्यक्तीकडेच नेता म्हणून पाहिले जाते ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले,‘‘भाजपने घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला असला, तरी कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखलेले नाही. राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीला राजकारणात यायचे असेल, तर त्यांनी अवश्य यावे; पण स्वतःच्या शक्तीवर यावे.

मोठ्या चित्रकारांची मूळ चित्रे असल्याचे भासवून बनावट चित्रे विकणारी टोळी गजाआड !

प्रसिद्ध चित्रकारांची मूळ चित्रे असल्याचे भासवून बनावट चित्रांच्या विक्रीद्वारे १७ कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश राजपाल आणि इतर आरोपी यांवर ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

इंडिया आघाडीच्या मुंबईतील सभेत भारताला धर्मनिरपेक्ष ठेवण्याचे आवाहन !

हिंदु धर्माला ‘मलेरिया’ म्हणणार्‍या उदयनिधी स्टॅलिन यांचीही उपस्थिती !

शीव (मुंबई) येथील मानव सेवा संघाच्या आश्रमाच्या तिजोरीतील पैसे गायब !

येथील मानव सेवा संघ या अनाथाश्रमाला येणार्‍या देणगीतील सुमारे ३६ लाख रुपये चोरीला गेले आहेत.या आश्रमात काम करणार्‍या एका रोखपालाने टप्प्याटप्प्याने ही रक्कम गायब केल्याचा संशय आहे.

स्वा. सावरकरांना ‘माफीवीर’ म्हणणार्‍या राहुल गांधी यांना उद्धव ठाकरे यांनी क्षमा मागण्यास सांगितले पाहिजे ! – रणजित सावरकर, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

राहुल गांधी यांनी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला होता, त्या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते, ‘‘यांना जोड्याने मारले पाहिजे.’’ आता कमीतकमी त्यांना क्षमा मागण्यास तरी त्यांनी सांगितले पाहिजे.

वीर सावरकर यांच्या अवमानाविषयी राहुल गांधी यांना िवचारला जाब !

स्वा. सावरकर यांच्या अवमानप्रकरणी काँग्रेस कधीच क्षमा मागणार नाही, हे लक्षात घेऊन सावरकरप्रेमींनी तिला निवडणुकीत जागा दाखवावी !