होळीच्या निमित्ताने अनोळखी व्यक्तींवर रंगांचे फुगे फेकल्यास होणार कारवाई !

होळीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी लावल्यास, अश्लील हावभाव केल्यास, तसेच अनोळखी व्यक्तींवर रंगांचे फुगे फेकल्यास कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी मुंबई पोलिसांनी दिली आहे.

विक्रोळी येथे हिंदु युवक-युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले !

विक्रोळी पार्क येथील नीलकंठेश्वर मंदिर येथे हिंदु युवक – युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले. यामध्ये कराटे, दंडसाखळी, लाठी-काठी यांचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच वक्त्यांनी भारतीय संस्कृती आणि भारताचा गौरवशाली इतिहास यांविषयी संबोधित केले.

अमरावतीतील विमानतळ ३१ मार्च, तर नवी मुंबईतील एप्रिलमध्ये चालू होणार !

अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून ३१ मार्चपासून प्रवासी सेवा चालू करण्याचे नियोजन आहे. उलवे येथे नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

राज्यात ‘फेक’ पनीरची विक्री

या फेक पनीरमध्ये दुधाचा समावेश नसतो. नागरिकांची फसवणूक करून अशा प्रकारे फेक पनीरची विक्री चालू आहे. असे फेक पनीर लहान मुलांना खायला दिले जात आहे.

‘पीओपी’वरील बंदी हटवण्यासाठी २० मार्चला न्यायालयात जाणार ! – आशिष शेलार, भाजप नेते

‘पीओपी’वर बंदी आणि शाडूमातीही पुरेशी नाही’ अशा परिस्थितीत जनतेने घरी श्री गणेशमूर्ती बसवायचीच नाही का ?

डोंबिवलीतील अनधिकृत इमारतींच्या प्रकरणाची चौकशी चालू; २६० भूमाफियांचा समावेश !

कागदपत्रे घेतांना महारेरा प्रशासनाने नीट पडताळून घेतली नाहीत कि तिथे आर्थिक हितसंबंध गुंतले होते ? हे आता समोर येईल; परंतु घोटाळे झाल्यानंतर त्यांची चौकशी होणे, हे किती दिवस चालणार ?

ठाणे जिल्ह्यात ४ सहस्र ८९५ कारखाने प्रदूषणकारी !

हिंदूंच्या सणांच्या वेळी ओरड करणारे पर्यावरणप्रेमी आता कुठे आहेत ? वरील स्थितीविषयी त्यांनी काय कृती केली, हे सांगायला हवे !

सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्‍ह्यांत खनिज तेलाचे साठे सापडले !

अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्‍ह्यांच्‍या सागरी क्षेत्रांत खनिज तेलाचे नवे साठे सापडले आहेत. अरबी समुद्रात ८ वर्षांपासून याविषयी संशोधन चालू होते. त्‍याला आता यश आले आहे.

अलमट्टी धरणाच्या उंचीच्या वाढीच्या विरोधात शासनाची भूमिका ! – विखे पाटील, जलसंपदामंत्री

राज्यातील शेतकरी आणि रहिवासी यांच्या हितासाठी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधात राज्यशासनाची भूमिका असल्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

लवकरच निधी देण्यात येईल ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम न भरणारे अधिकारी आणि राज्य परिवहन मंडळाचे प्रमुख यांवर कारवाई करणार का ?