आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (१८ एप्रिल २०२५)
मुंबई मध्यवर्ती कारागृहात ९९९ बंदीवान राहू शकतात; मात्र सध्या येथे ३ सहस्र ३६१ बंदीवानांना ठेवण्यात आले आहे. पुरेशी जागा आणि सोयी-सुविधांअभावी कारागृहात शिक्षा भोगणार्यांना अडचणी येत आहेत.
मुंबई मध्यवर्ती कारागृहात ९९९ बंदीवान राहू शकतात; मात्र सध्या येथे ३ सहस्र ३६१ बंदीवानांना ठेवण्यात आले आहे. पुरेशी जागा आणि सोयी-सुविधांअभावी कारागृहात शिक्षा भोगणार्यांना अडचणी येत आहेत.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचला पाहिजे, हा मौलिक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. या विचारांवर आधारित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव’ राज्यभरात राबवण्यात येणार आहे.
येत्या काळात पथकर नाकेच नसतील. आता प्रवाशांना कुणीही अडवणार नाही. कॅमेर्याद्वारे प्रवाशांच्या वाहनाच्या क्रमांकावरून पथकर त्यांच्या बँक खात्यातून आपोआप कापला जाईल !
हे विमानतळ उड्डाण योजनेअंतर्गत असल्याने तिकीट सर्वसामान्यांना परवडणारे आहे. दुरांतो एक्सप्रेसच्या प्रथम श्रेणी वातानूकुलित तिकिटाच्या शुल्कापेक्षा मुंबई विमान प्रवासाचे शुल्क अल्प आहे. भविष्यात मागणीनुसार तिकिटांचे शुल्क वाढू शकते.
हा रेल्वेचा देशातील पहिलाच प्रयोग आहे. हे एटीएम् यंत्र नाशिकमधील मनमाड ते मुंबई धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये बसवण्यात आले आहे.
राज्यातील २० आयटीआयमध्ये (औद्योगिक प्रशिक्षिण संस्था) अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार
राज्यातील ८ अग्नीशमन अधिकारी आणि जवान यांना ‘राष्ट्रपती’ पदके प्रदान
येथील पनवेल महानगरपालिकेच्या ‘पनवेल कनेक्ट’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांना ६३ ऑनलाइन विविध सेवा घरबसल्या मिळतील. या ॲपचे लोकार्पण भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दि.बा. पाटील विद्यालयात करण्यात आले.
गुन्ह्यांच्या कलमांचा केक कापून वाढदिवस साजरा करणार्या गुंडाचा जामीन त्वरित रहित करून त्याला पुन्हा कोठडीत डांबावे !
केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून घोषित करण्यात येत असलेली नियमावली शिथिल करण्याविषयी भूषण गगराणी यांच्याशी चर्चा झाली असून यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.