आर्थिक सक्षमतेसाठी प्रत्येक एस्.टी. आगाराचा स्वतंत्र विकास आराखडा करावा ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) आगारांच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात यावी. त्यासाठी प्रत्येक आगाराचा स्वतंत्र विकास आराखडा सिद्ध करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.