शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे विधान

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – आतंकवादाचा धर्म इस्लाम आहे. आतंकवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांची हत्या केली, असे विधान ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली आहे. त्यांनी या आक्रमणावरून दुःख व्यक्त केले आहे. ‘जर पहलगाम आक्रमणामध्ये पाकिस्तानचा हात असेल, तर भारताने पाकिस्तानशी युद्ध करायला हवे’, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
#PahalgamTerroristAttack: Shankaracharya Avimukteshwarananda says it straight — terrorism has a Religion, but no party will dare admit it.
Why? Because Hindu lives matter less to them than vote banks!"#PakistanBehindPahalgam #GlobalTerrorist
आतंकवाद का धर्म होता है
VC:… pic.twitter.com/VzTHBa8TOf— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2025
शंकराचार्य पुढे म्हणाले की, हिंदूंना धर्मशास्त्रांसमवेत शस्त्रांचे ज्ञान घेतले पाहिजे. शंकराचार्य यांनी सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या विधानांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही, असे ते म्हणाले. वाड्रा यांनी देशात हिंदु आणि मुसलमान यांच्यात फूट पाडली जात असल्याने हे आक्रमण झाल्याचा दावा केला होता.
संपादकीय भूमिकाशंकराचार्य ज्या स्पष्टतेने सांगत आहेत, तसे देशातील एकही राजकीय पक्ष बोलत नाही आणि बोलणार नाही; कारण त्यांना हिंदूंच्या जीवनापेक्षा मत आणि त्यातून मिळणारी सत्ता यांची अधिक काळजी आहे ! |