
मुंबई – महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांना ४८ घंट्यांच्या आत देशातून बाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तानी नागरिकांनी राज्यात थांबू नये. त्यांच्या हालचालींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. लवकरच त्यांना राज्याबाहेर काढू. ४८ घंट्यांमध्ये पाकिस्तानी भारताबाहेर गेले नाहीत, तर राज्यातील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, अशी चेतावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे पारपत्र रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची सूची आम्ही मिळवली आहे. याविषयी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आली आहे.’’