पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांचे संतापजनक विधान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर भारताकडे पहलगाम येथील आक्रमणात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे पुरावे असतील, तर त्याने ते जगासमोर सादर करावेत. भारताने अशा घटनांसाठी पाकिस्तानवर वारंवार आरोप केले आहेत. या वेळीही भारताने तोच खेळ खेळला आहे. पहलगाममध्ये आक्रमण करणारे स्वातंत्र्यसैनिक असू शकतात. आपल्याला ‘ते कोण आहेत ?’, हे ठाऊक नाही. मला वाटते भारत त्याच्या अपयशासाठी आणि त्याच्या देशांतर्गत राजकारणासाठी पाकिस्तानला दोष देत आहे, अशा शब्दांत पाकचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री असणारे इशाक डार यांनी भारतावर आरोप केले आहेत.
इशाक डार पुढे म्हणाले की, जर कुणी कोणतेही दुष्प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, तर पाकिस्तानी सैन्य अशा आव्हानाला उत्तर देण्यास सिद्ध आहे.
संपादकीय भूमिकाबलुचिस्तानमध्ये लढणारी ‘बलुच लिबरेशन आर्मी’ ही संघटनाही स्वातंत्र्यसैनिकांची संघटना आहे, असे आता भारतानेही पाकला म्हटले पाहिजे ! |