जम्मू-काश्मीरमधून १ सहस्र ६८० नागरिकांचा महाराष्ट्र शासनाशी संपर्क, बहुतांश नागरिक परतले !

मुंबई, २५ एप्रिल (वार्ता.) – जम्मू-काश्मीरमधून आतापर्यंत १ सहस्र ६८० नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राशी संपर्क साधला. यांतील बहुतांश नागरिक महाराष्ट्रात परतले आहेत. आतापर्यंत २ विशेष विमानांद्वारे १८४ पर्यटक मुंबईत पोचले आहेत, तर २३२ पर्यटकांना घेऊन इंडिगोचे तिसरे विशेष विमान २५ एप्रिलला श्रीनगर येथून निघाले आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.