तमिळ ब्राह्मण न्यायमूर्तींच्या नावाने आयोजित कार्यक्रम !
(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम्, म्हणजेच द्रविड प्रगती संघ)

चेन्नई (तमिळनाडू) : मद्रास विद्यापिठात ‘भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार कसा करायचा ?’ या विषयावर एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे १०० वर्षांपूर्वीचे मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि एक तमिळ ब्राह्मण एस्. सुब्रमणिया अय्यर यांच्या नावाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ मार्चला आयोजित होणार्या या कार्यक्रमात के. सिवा कुमार हे भाषण करणार असून व्याख्यानाचे पत्रक सध्या सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहे. या विरोधात सामाजिक माध्यमांत हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
🚨The Madras University is set to host a lecture titled “How to Spread Christianity in India”—ironically, in the name of a Tamil Brahmin judge! 🤔
🔴 BJP raises strong objections!
🔸 Those who cry “Saffronization” over Bhagavad Gita in schools are silent on this… pic.twitter.com/aZDJ54oKPH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 8, 2025
१. प्रसारित झालेल्या या पत्रकानुसार, विद्यापिठाच्या ‘प्राचीन इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र विभागा’ने ‘सर एस्. सुब्रमणिया अय्यर एंडोमेंट लेक्चर’अंतर्गत ‘भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार कसा करावा ?’, तसेच ‘हा धर्म का आवश्यक आहे ?’ या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
२. या व्याख्यानाचे मुख्य वक्ते अभियंता के. शिवकुमार, (मुख्य अभियंता, भाग्यनगर) असतील.
३. विशेष म्हणजे, विद्यापिठात ख्रिस्ती अध्ययनासाठी वेगळा विभाग असतांना प्राचीन इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र विभागाने हे धार्मिक व्याख्यान आयोजित करणे संशयास्पद मानले जात आहे.

(चित्रावर क्लिक करा)
विद्यापिठाच्या प्रतिष्ठेवर परिणाम !मद्रास विद्यापिठाने सुप्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन्, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्, भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही. रामन, हिंदु आध्यात्मिक गुरु स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांच्यासारख्या अनेक महान व्यक्तीमत्त्वांना घडवले आहे. ही घटना मात्र मद्रास विद्यापिठाच्या प्रतिष्ठेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. |
भाजपकडून विरोध !
‘मद्रास विद्यापिठात ‘भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार कसा करावा ?’ या विषयावर व्याख्यान ! कट्टरतावाद ? अतिरेकी प्रचार ? कुणाला काही बोलायचे आहे का ?’, अशा शब्दांत तमिळनाडूतील भाजपचे राज्य सचिव डॉ. एस्.जी. सूर्या यांनी ‘एक्स’वरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दुसरीकडे ज्येष्ठ विचारवंत एस्. गुरुमूर्ती यांनी म्हटले की,
This does not add any merit to Xianity except to certify it will fraudulently convert not only individuals but also intellectual institutions https://t.co/akwjukDggM
— S Gurumurthy (@sgurumurthy) March 7, 2025
‘या कार्यक्रमामुळे ख्रिस्ती धर्माची प्रतिष्ठा वाढत नाही, उलट यामुळे ख्रिस्ती धर्माने केवळ व्यक्तींनाच नव्हे, तर बौद्धिक संस्थांनाही फसव्या मार्गाने प्रभावित केले आहे, हे सिद्ध होते.’
संपादकीय भूमिका
|