महुआबाईंचे तर्कट !

श्रीरामाचा विषय आला की, तृणमूल काँग्रेसचे नेते हे ‘पाकचे नेते’ असल्याप्रमाणे वारंवार चवताळून उठतात, हा नेहमीचा अनुभव आहे. सरकार स्पष्टपणे काही भूमिका घेत असूनही साम्यवादी, समाजवादी सतत हिंदुद्वेषाचा पाऊस पाडत असतात.

(म्हणे) ‘लोकशाहीवरील आक्रमणे !’

यापूर्वी अंनिसवर विदेशातून मिळालेल्या निधीचा हिशोब दिला नसल्याचा आरोप झाला होता. हे पहाता सरकारने अशा प्रकारच्या सर्वच सामाजिक संस्थांची माहिती गोळा केली पाहिजे. जेणेकरून ‘टूलकिट’सारखी प्रकरणे भविष्यात होणार नाहीत !

इतिहास रचणारे भारतीय !

रश्मी सामंत नावाच्या ऑक्सफर्ड येथे शिकणार्‍या भारतीय विद्यार्थिनीने एक अनोखा इतिहास रचला आहे. ती ‘ऑक्सफर्ड स्टुडंट युनियन’च्या अध्यक्ष म्हणून निवडून आली आहे. अशी निवड होणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. तिच्या चमूत अन्य काही भारतीय मुलेही निवडून आली आहेत.

हिंदूंच्या पाठीत ‘खंजीर’ !

जात-पात, संप्रदाय, पद, पक्ष, संघटना आदी सर्व भेद बाजूला सारून बलशाली हिंदूसंघटन होण्यास सुसज्ज व्हायला हवे. तर आणि तरच कुणी हिंदूंकडे वाकड्या दृष्टीने पहाण्यास धजावणार नाही. असे झाले, तरच आगामी काळात कुणी ‘रिंकू शर्मा’ झालेले पहायला मिळणार नाही.

‘ट्विटर’ला इंगा !

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देशात सर्वांनाच आहे. यामध्ये सामाजिक संकेतस्थळांची भूमिका तितकीच महत्त्वाची ठरते. आज प्रत्येक जण आपल्या भावना किंवा विचार त्यांवर अगदी सहजगत्या व्यक्त करत असतो. सर्वांच्या वाढत्या वापरामुळे सामाजिक संकेतस्थळांचा वारू चौफेर उधळत चालला आहे.

अन्सारी आणि असुरक्षितता !

अन्सारी यांची वक्तव्ये हा वैचारिक आतंकवादाचा प्रकार आहे, जो जिहादी आतंकवादापेक्षाही भयंकर आहे. हे लक्षात घेऊन त्यांच्या वक्तव्यांचा सर्वच व्यासपिठांवरून वैचारिक प्रतिवाद करणे आवश्यक आहे. यासाठी धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि त्याहून अधिक सरकारने कठोर प्रयत्न करणे आवश्यक !

उत्तराखंडातील हाहाःकार !

निसर्गावर जेव्हा जेव्हा बंधने घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे, तेव्हा तेव्हा निसर्गाने त्याच्या दुप्पट परतावा दिला आहे म्हणजे हानी केली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. वीज आणि पाणी मनुष्याची मूलभूत आवश्यकता मानली गेली, तरी त्यासाठी निसर्गावर नाही, तर मनुष्याने स्वतःवर बंधने घालणे आवश्यक आहे.

अमेरिकेला सुनवा !

अमेरिकेतील भारतीयांनी भारताची बाजू उचलून धरली पाहिजे; कमीतकमी भारताचा अवमान किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होणार्‍या गोष्टींना सामाजिक माध्यमांवर निषेधाचा सूर लावायला हवा. अमेरिका ही भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी आहे. आक्रमकपणे तिला प्रत्युत्तर देत राहिले, तरच ती ताळ्यावर येईल !

म्यानमारमधील सत्तापालट !

भारतही स्वतः बलशाली झाल्यास हाती अनेक पर्याय उपलब्ध असतात आणि व्यापक विचार करून  त्यानुसार कृती करणे शक्य होते. म्यानमारमधील सत्तापालटातून भारताने बलशाली होणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

सर्जिकल स्ट्राईक

इराण जर त्याच्या सैनिकांना सोडवून आणू शकतो, तर भारताने मागे का रहावे ? सैनिक तर त्यासाठी सिद्धच आहेत. केवळ केंद्र सरकारने आदेश द्यावा, ही भारतियांची मागणी आहे.