७८ गावांमध्ये ‘सुसंस्कार शिबिरा’द्वारे अडीच लाख विद्यार्थ्यांवर संस्कारांचे सिंचन !
‘श्री गुरुदेव सेवा मंडळा’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील ७८ गावांमध्ये यंदा ‘सुसंस्कार शिबिरे’ आयोजित करण्यात आली असून यामध्ये अनुमाने अडीच लाख विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून बालमनावर अध्यात्माचे धडे गिरवले जात असून आदर्श राष्ट्रनिर्मितीसाठी तरुण पिढीला घडवण्यात येत आहे. पुणे, अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, वाशीम आणि जळगाव यांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये या शिबिरांचा प्रसार झाला आहे.